शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
2
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
3
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
4
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
5
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
6
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
7
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
8
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
9
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
10
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
11
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
12
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
13
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
14
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
15
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
16
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
17
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
18
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
19
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
20
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

रत्नागिरी जिल्ह्यालाही भारनियमनाची झळ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:43 IST

रत्नागिरी : आॅक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीत वाढ होत असतानाच राज्यात कोळसा तुटवडा भासत असल्याने औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती घटली ...

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यालाही भारनियमनाची झळ..आॅक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीत वाढ

रत्नागिरी : आॅक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीत वाढ होत असतानाच राज्यात कोळसा तुटवडा भासत असल्याने औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती घटली आहे. खुल्या बाजारातून वीज खरेदी करून वीजपुरवठा करण्यात येत असला तरी तूट भरून काढण्यासाठी जी-१ ते जी-३ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५३ फिडर असून जी-१ ते जी-३ मध्ये तीन फिडरचा समावेश आहे. त्यामुळे भारनियमनाची झळ बसू लागली आहे.सध्या भारनियमन फिडरनिहाय सुरू करण्यात आले आहे. ज्या फिडरवर वीज गळती अधिक शिवाय व वीजबील वसुलीचे प्रमाण कमी अशा फिडरची वर्गवारी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १५३ फिडर असून ह्यएह्ण ते ह्यझेडह्ण गटात फिडर विभागण्यात आले आहेत. ह्यएह्ण गटात १७, ह्यबीह्ण गटात ३९, ह्यसीह्ण गटात २९, ह्यडीह्ण गटात २६, ह्यइह्ण गटात ८, ह्यएफह्ण गटात ४, जी-१ ते जी-३ मध्ये प्रत्येकी १ तर झेड गटात २७ फिडर आहेत. इ व एफ गटातील फिडर सध्या काठावर असल्याने या फिडरना भविष्यात भारनियमनाचा धोका आहे.रत्नागिरी जिल्हा वीजबील वसुलीमध्ये अग्रक्रमांकावर होता. शिवाय वीज गळतीचे प्रमाणही अत्यल्प होते. मात्र सध्या थकबाकीचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यातील घरगुती तसेच इतर विविध एक लाख ७५ हजार ९३ ग्राहकांकडे १७ कोटी ३१ लाख १० हजाराची थकबाकी शिल्लक राहिल्याने महावितरणने वसुली मोहिम तीव्र केली आहे. जिल्ह्यातील ९६ हजार ८०१ घरगुती ग्राहकांकडे १२ कोटी १७ लाख ७९ रूपये थकबाकी शिल्लक आहे. कृषीपंपाच्या ६ हजार २२३ ग्राहकांकडे ५७ लाख २८ हजार रूपये थकित आहेत. इतर ४ हजार ५६९ ग्राहकांकडे ४ कोटी ५६ लाख ३ हजाराची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीचे महावितरण पुढे आव्हान उभे ठाकले असून महावितरणने वसुली मोहीम सुरू केली आहे. तरीही वीजबील भरण्यासाठी नकार देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठाच खंडित केला जात आहे.ज्या फिडरवर अधिक थकबाकी, शिवाय वीज चोरी किंवा गळतीचे प्रमाण अधिक असणाºया फिडरची वर्गवारी करण्यात येत आहे. त्यानुसार त्या फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. भारनियमन मुक्त, वसुलीमध्ये अव्वल व वीज गळती/चोरी नसलेला म्हणून रत्नागिरी जिल्हा अग्रक्रमावर असताना जिल्ह्यातही थकबाकी वाढली आहे. आकडा टाकून वीज चोरीचे प्रमाणही वाढले आहे. वीजबील भरण्याकरिता महावितरणने ग्राहकांना सुलभ व्हावे यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. घरबसल्या ग्राहकांना वीजबिल भरणे शक्य झाले आहे. मात्र तरीही ग्राहकांकडून वीज बिल वेळेवर न भरण्याबाबतची अनास्था वाढली आहे. यामध्ये राजकीय लोकांचाही सहभाग अधिक आहे. सर्वात अधिक थकबाकी रत्नागिरी विभागात असून पाठोपाठ खेड विभाग आहे. तृतीय क्रमांकावर चिपळूण विभाग आहे.विजेच्या मागणीत आता विक्रमी होत असून आतापर्यत तब्बल २४९६२ मेगावॉट सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली आहे. केंद्रिय कंपनीकडून ५१४७, औष्णिक प्रकल्प ५३६२, अदानी ३०८५, धारिवाल प्रकल्प १०५, गॅस २५१, कोयना ३८, पवनउर्जा ७०, सोलर ४८२, रतन इंडिया पॉवर २७४, जिंदाल समूह २८० मिळून एकूण १४ हजार ९८९ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. शिवाय खुल्या बाजारातून ३००० मेगावॅट वीज खरेदी करण्यात येत आहे. परंतु विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी अखेर जी-१ ते जी-३ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. जिल्ह्यात ए गटात असणारे फिडर १७ आहेत. ब गटात सर्वात अधिक फिडर आहेत. क व ड गटातही बºयापैकी संख्या आहे. इ व फ गटातील फिडर काठावर असून या फिडरना भारनियमनाचा धोका आहे. वसूलीचे प्रमाण घटले व वीज हानी वाढली तर मात्र भारनियमन अटळ आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी