शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

रत्नागिरी जिल्ह्यालाही भारनियमनाची झळ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:43 IST

रत्नागिरी : आॅक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीत वाढ होत असतानाच राज्यात कोळसा तुटवडा भासत असल्याने औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती घटली ...

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यालाही भारनियमनाची झळ..आॅक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीत वाढ

रत्नागिरी : आॅक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीत वाढ होत असतानाच राज्यात कोळसा तुटवडा भासत असल्याने औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती घटली आहे. खुल्या बाजारातून वीज खरेदी करून वीजपुरवठा करण्यात येत असला तरी तूट भरून काढण्यासाठी जी-१ ते जी-३ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५३ फिडर असून जी-१ ते जी-३ मध्ये तीन फिडरचा समावेश आहे. त्यामुळे भारनियमनाची झळ बसू लागली आहे.सध्या भारनियमन फिडरनिहाय सुरू करण्यात आले आहे. ज्या फिडरवर वीज गळती अधिक शिवाय व वीजबील वसुलीचे प्रमाण कमी अशा फिडरची वर्गवारी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १५३ फिडर असून ह्यएह्ण ते ह्यझेडह्ण गटात फिडर विभागण्यात आले आहेत. ह्यएह्ण गटात १७, ह्यबीह्ण गटात ३९, ह्यसीह्ण गटात २९, ह्यडीह्ण गटात २६, ह्यइह्ण गटात ८, ह्यएफह्ण गटात ४, जी-१ ते जी-३ मध्ये प्रत्येकी १ तर झेड गटात २७ फिडर आहेत. इ व एफ गटातील फिडर सध्या काठावर असल्याने या फिडरना भविष्यात भारनियमनाचा धोका आहे.रत्नागिरी जिल्हा वीजबील वसुलीमध्ये अग्रक्रमांकावर होता. शिवाय वीज गळतीचे प्रमाणही अत्यल्प होते. मात्र सध्या थकबाकीचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यातील घरगुती तसेच इतर विविध एक लाख ७५ हजार ९३ ग्राहकांकडे १७ कोटी ३१ लाख १० हजाराची थकबाकी शिल्लक राहिल्याने महावितरणने वसुली मोहिम तीव्र केली आहे. जिल्ह्यातील ९६ हजार ८०१ घरगुती ग्राहकांकडे १२ कोटी १७ लाख ७९ रूपये थकबाकी शिल्लक आहे. कृषीपंपाच्या ६ हजार २२३ ग्राहकांकडे ५७ लाख २८ हजार रूपये थकित आहेत. इतर ४ हजार ५६९ ग्राहकांकडे ४ कोटी ५६ लाख ३ हजाराची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीचे महावितरण पुढे आव्हान उभे ठाकले असून महावितरणने वसुली मोहीम सुरू केली आहे. तरीही वीजबील भरण्यासाठी नकार देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठाच खंडित केला जात आहे.ज्या फिडरवर अधिक थकबाकी, शिवाय वीज चोरी किंवा गळतीचे प्रमाण अधिक असणाºया फिडरची वर्गवारी करण्यात येत आहे. त्यानुसार त्या फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. भारनियमन मुक्त, वसुलीमध्ये अव्वल व वीज गळती/चोरी नसलेला म्हणून रत्नागिरी जिल्हा अग्रक्रमावर असताना जिल्ह्यातही थकबाकी वाढली आहे. आकडा टाकून वीज चोरीचे प्रमाणही वाढले आहे. वीजबील भरण्याकरिता महावितरणने ग्राहकांना सुलभ व्हावे यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. घरबसल्या ग्राहकांना वीजबिल भरणे शक्य झाले आहे. मात्र तरीही ग्राहकांकडून वीज बिल वेळेवर न भरण्याबाबतची अनास्था वाढली आहे. यामध्ये राजकीय लोकांचाही सहभाग अधिक आहे. सर्वात अधिक थकबाकी रत्नागिरी विभागात असून पाठोपाठ खेड विभाग आहे. तृतीय क्रमांकावर चिपळूण विभाग आहे.विजेच्या मागणीत आता विक्रमी होत असून आतापर्यत तब्बल २४९६२ मेगावॉट सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली आहे. केंद्रिय कंपनीकडून ५१४७, औष्णिक प्रकल्प ५३६२, अदानी ३०८५, धारिवाल प्रकल्प १०५, गॅस २५१, कोयना ३८, पवनउर्जा ७०, सोलर ४८२, रतन इंडिया पॉवर २७४, जिंदाल समूह २८० मिळून एकूण १४ हजार ९८९ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. शिवाय खुल्या बाजारातून ३००० मेगावॅट वीज खरेदी करण्यात येत आहे. परंतु विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी अखेर जी-१ ते जी-३ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. जिल्ह्यात ए गटात असणारे फिडर १७ आहेत. ब गटात सर्वात अधिक फिडर आहेत. क व ड गटातही बºयापैकी संख्या आहे. इ व फ गटातील फिडर काठावर असून या फिडरना भारनियमनाचा धोका आहे. वसूलीचे प्रमाण घटले व वीज हानी वाढली तर मात्र भारनियमन अटळ आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी