शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
3
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
4
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
5
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
6
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
7
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
8
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
10
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
11
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
12
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
13
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
14
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
15
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
16
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
17
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
18
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
19
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
20
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी..महावितरणचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 4:04 PM

गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावीमहावितरणचे आवाहन : विद्युत रोषणाई करताना सावधान

रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे.गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असली तरी तात्पुरती सवलतीच्या दरात वीजजोडणी घेणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात अवघी १९ आहे. रत्नागिरी शहरात ६, राजापूर १, लांजा १, चिपळूण शहर ४, खेडमध्ये १, दापोली १ मध्ये २, दापोली २ मध्ये १, मिळून १६ जोडण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून सिंगल फेजचे एकूण १० व थ्री फेजचे ६ मिळून १६ जोडण्यांची मागणी केली होती, त्यानुसार महावितरणकडून जोडण्या देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असताना महावितरणने उत्सव कालावधीत महावितरणने सवलतीच्या दरात वीजपुरठा घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव कालावधीसाठी सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला जातो. प्रतियुनिट ४ रूपये ३८ पैसे दराने वीज दर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सव कालावधीसाठी वीज जोडणी देत असताना अनामत रक्कम घेण्यात येते. अनामत रकमेतून वीज वापराच्या रकमेशिवाय उर्वरित रक्कम संबंधित सार्वजनिक मंडळांना परत करण्यात येणार आहे.वीज वाहिन्यांसाठी गणेशमूर्ती अडचणीच्या ठरणार नाहीत, अशा प्रकारे ठेवून प्राणांतिक अपघात टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. शिवाय गणपती उत्सवाच्या कालावधीत वीज जोडणी व रोषणाई मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून करण्याचे आवाहन केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विद्युत संचाच्या जोडणीची तपासणी विद्युत निरीक्षकांकडून करून घ्यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी खड्डे करताना वीज वाहिन्या किंवा भूमिगत वाहिन्यांना धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरगुती, सार्वजनिक ठिकाणी वाहिन्या उघड्या राहणार नाहीत, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अखंड वीजपुरवठाविजेच्या लघुदाब व उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्याला स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावे, तसेच श्रींच्या मिरवणुकीवेळी वीज वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, अशी खबरदारी घ्यावी. उत्सवाच्या काळात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे, असे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेठकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी