शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले; खेड, राजापूर, संगमेश्वरात पूरस्थिती, जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:53 IST

जगबुडी नदीचे पाणी धाेका पातळीच्या वर

रत्नागिरी : जिल्ह्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा शनिवारी मध्यरात्रीपासून जाेर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडीचे पाणी धाेका पातळीच्या वर पाेहाेचले असून, रविवारी सायंकाळी नदीची पाणीपातळी ९ मीटरपर्यंत हाेती. त्याचबराेबर काजळी नदी (१७.७८ मीटर), अर्जुना नदी (६.३० मीटर), शास्त्री नदी (७ मीटर) आणि मुचकुंदी नदी (४ मीटर)चे पाणी इशारा पातळीच्या वर आले हाेते.राजापुरातील अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी शहरातील शिवाजी पुतळ्यापर्यंत आले हाेते. लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने त्याचा फटका रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराई, इब्राहिमपट्टणम आणि हातिस या भागाला बसला. हरचिरी आणि चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने या भागातील वाहतूक बंद पडली हाेती. तसेच संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीचे पाणी वाढल्याने माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले हाेते. तालुक्यातील अन्य भागांमध्येही रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली हाेती.चिपळूणमधील वशिष्ठी नदीचे पाणीही सायंकाळी वाढले हाेते. तसेच गुहागर आणि दापाेली तालुक्यांनाही पावसाने झाेडपून काढले. मंडणगड तालुक्यातील भाेळवली लघुपाटबंधारे याेजना पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून व विमाेचकातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नगरपंचायत हद्दीतील गांधी चाैक येथील फरशी पुलाजवळील रस्ता खचल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

पुराच्या पाण्यात वाहून मृत्यूखेड तालुक्यातील चिंचवली चव्हाणवाडी येथील रामचंद्र सखाराम पवार (६२, रा. चिंचवली, चव्हाणवाडी) हे १८ जुलै राेजी सायंकाळी पाच वाजता प्रात:विधीसाठी नदीवर गेले हाेते. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या पाण्यात पडून वाहून गेले. शनिवारी (२० जुलै) दुपारी तीन वाजता त्यांचा मृतदेह बाेरघर - ब्राह्मणवाडी येथे विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळील नदीकिनारी झुडपात सापडला.

नवीन पुलाला भगदाडमुंबई-गाेवा महामार्गावरील खेड-भरणे नाका येथील जगबुडी नदीवर बांधलेल्या नवीन पुलाला भगदाड पडल्याचे रविवारी सायंकाळी लक्षात आले. हा प्रकार काही रिक्षाचालकांच्या लक्षात आला. या प्रकारानंतर या ठिकाणी पाेलिस तैनात करण्यात आले असून, मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसRajapurराजापुरKhedखेडfloodपूर