शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
3
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
4
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
5
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
8
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
9
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
10
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
11
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
12
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
14
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
15
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
16
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
17
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
18
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
19
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
20
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले; खेड, राजापूर, संगमेश्वरात पूरस्थिती, जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:53 IST

जगबुडी नदीचे पाणी धाेका पातळीच्या वर

रत्नागिरी : जिल्ह्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा शनिवारी मध्यरात्रीपासून जाेर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडीचे पाणी धाेका पातळीच्या वर पाेहाेचले असून, रविवारी सायंकाळी नदीची पाणीपातळी ९ मीटरपर्यंत हाेती. त्याचबराेबर काजळी नदी (१७.७८ मीटर), अर्जुना नदी (६.३० मीटर), शास्त्री नदी (७ मीटर) आणि मुचकुंदी नदी (४ मीटर)चे पाणी इशारा पातळीच्या वर आले हाेते.राजापुरातील अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी शहरातील शिवाजी पुतळ्यापर्यंत आले हाेते. लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने त्याचा फटका रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराई, इब्राहिमपट्टणम आणि हातिस या भागाला बसला. हरचिरी आणि चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने या भागातील वाहतूक बंद पडली हाेती. तसेच संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीचे पाणी वाढल्याने माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले हाेते. तालुक्यातील अन्य भागांमध्येही रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली हाेती.चिपळूणमधील वशिष्ठी नदीचे पाणीही सायंकाळी वाढले हाेते. तसेच गुहागर आणि दापाेली तालुक्यांनाही पावसाने झाेडपून काढले. मंडणगड तालुक्यातील भाेळवली लघुपाटबंधारे याेजना पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून व विमाेचकातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नगरपंचायत हद्दीतील गांधी चाैक येथील फरशी पुलाजवळील रस्ता खचल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

पुराच्या पाण्यात वाहून मृत्यूखेड तालुक्यातील चिंचवली चव्हाणवाडी येथील रामचंद्र सखाराम पवार (६२, रा. चिंचवली, चव्हाणवाडी) हे १८ जुलै राेजी सायंकाळी पाच वाजता प्रात:विधीसाठी नदीवर गेले हाेते. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या पाण्यात पडून वाहून गेले. शनिवारी (२० जुलै) दुपारी तीन वाजता त्यांचा मृतदेह बाेरघर - ब्राह्मणवाडी येथे विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळील नदीकिनारी झुडपात सापडला.

नवीन पुलाला भगदाडमुंबई-गाेवा महामार्गावरील खेड-भरणे नाका येथील जगबुडी नदीवर बांधलेल्या नवीन पुलाला भगदाड पडल्याचे रविवारी सायंकाळी लक्षात आले. हा प्रकार काही रिक्षाचालकांच्या लक्षात आला. या प्रकारानंतर या ठिकाणी पाेलिस तैनात करण्यात आले असून, मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसRajapurराजापुरKhedखेडfloodपूर