शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव परिसरात नळाला पंप, ग्रामपंचायतीकडून घरोघरी सूचनापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:37 IST

रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रात नळपाणी जोडणीला पंप बसवून पाणी वेगात खेचणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे तसेच मीटरच्या आधी असलेल्या जलवाहिनीला टॅब जोडून फुकट पाणी वापरणे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घेतली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीनजीकच्या कुवारबाव परिसरात नळाला पंपग्रामपंचायतीकडून घरोघरी सूचनापत्र

रत्नागिरी : तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रात नळपाणी जोडणीला पंप बसवून पाणी वेगात खेचणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे तसेच मीटरच्या आधी असलेल्या जलवाहिनीला टॅब जोडून फुकट पाणी वापरणे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या पथकातर्फे अशा जोडणीधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांना २५ हजार रुपये दंड आकारला जाणार असून, पाणीपंपही जप्त केले जाणार आहेत.कुवारबाव ग्रामपंचायतीची स्वत:ची नळपाणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात कुवारबावमध्ये गृहसंकुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पाणीजोडण्याही वाढल्या आहेत. त्या तुलनेत एमआयडीसीकडून या नळपाणी योजनेला अधिक पाण्याचा पुरवठा होत नाही. मात्र, गेल्या दोन - तीन वर्षांच्या काळात नळयोजनेच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत.

काहीजण नळजोडणीला पंप जोडून अतिरिक्त प्रमाणात पाणी खेचत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेजारील नळजोडणी धारकांना अल्प प्रमाणात किंवा कमी दाबाने पाणी मिळणे, ही समस्या निर्माण झाली आहे.याबाबत ग्रामपंचायतीकडे काही तक्रारी आल्याने २५ एप्रिल २०१८च्या ग्रामपंचायत सभेत या समस्येवर मात करण्यासाठी १५/१ नंबरने ठराव करण्यात आला आहे. नळजोडणीला पंप बसविणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे किंवा मीटरच्या पाठीमागून अनधिकृतपणे पाणी भरणे, असे प्रकार आढळून आल्यास संबंधित नळजोडणी धारकाला २५ हजार रुपये दंड केला जाणार आहे.

तसेच पाणीपंपही जप्त केला जाईल. संबंधित घर नंबरची नळजोडणी कायमस्वरुपी बंद करण्यात येईल, असे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. याबाबतची सूचना सर्व नळजोडणीधारकांना लेखी स्वरुपात देण्यात आली आहे.धडक मोहिमेची गरजकुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रातील नळपाणी योजनेच्या पाण्याचा गैरवापर, पाणीचोरी याला आळा घालण्यासाठी नळयोजनेच्या ज्या भागात पाणी सोडण्यात येते, त्याचवेळी संबंधित विभागातील नळजोडण्यांची पाहणी, तपासणी करण्याची धडक मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. यासाठी ग्रामपंचायत आता पथकाची नियुक्ती करणार की, ही मोहीम कागदावरच राहणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी