शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव परिसरात नळाला पंप, ग्रामपंचायतीकडून घरोघरी सूचनापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:37 IST

रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रात नळपाणी जोडणीला पंप बसवून पाणी वेगात खेचणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे तसेच मीटरच्या आधी असलेल्या जलवाहिनीला टॅब जोडून फुकट पाणी वापरणे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घेतली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीनजीकच्या कुवारबाव परिसरात नळाला पंपग्रामपंचायतीकडून घरोघरी सूचनापत्र

रत्नागिरी : तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रात नळपाणी जोडणीला पंप बसवून पाणी वेगात खेचणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे तसेच मीटरच्या आधी असलेल्या जलवाहिनीला टॅब जोडून फुकट पाणी वापरणे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या पथकातर्फे अशा जोडणीधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांना २५ हजार रुपये दंड आकारला जाणार असून, पाणीपंपही जप्त केले जाणार आहेत.कुवारबाव ग्रामपंचायतीची स्वत:ची नळपाणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात कुवारबावमध्ये गृहसंकुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पाणीजोडण्याही वाढल्या आहेत. त्या तुलनेत एमआयडीसीकडून या नळपाणी योजनेला अधिक पाण्याचा पुरवठा होत नाही. मात्र, गेल्या दोन - तीन वर्षांच्या काळात नळयोजनेच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत.

काहीजण नळजोडणीला पंप जोडून अतिरिक्त प्रमाणात पाणी खेचत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेजारील नळजोडणी धारकांना अल्प प्रमाणात किंवा कमी दाबाने पाणी मिळणे, ही समस्या निर्माण झाली आहे.याबाबत ग्रामपंचायतीकडे काही तक्रारी आल्याने २५ एप्रिल २०१८च्या ग्रामपंचायत सभेत या समस्येवर मात करण्यासाठी १५/१ नंबरने ठराव करण्यात आला आहे. नळजोडणीला पंप बसविणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे किंवा मीटरच्या पाठीमागून अनधिकृतपणे पाणी भरणे, असे प्रकार आढळून आल्यास संबंधित नळजोडणी धारकाला २५ हजार रुपये दंड केला जाणार आहे.

तसेच पाणीपंपही जप्त केला जाईल. संबंधित घर नंबरची नळजोडणी कायमस्वरुपी बंद करण्यात येईल, असे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. याबाबतची सूचना सर्व नळजोडणीधारकांना लेखी स्वरुपात देण्यात आली आहे.धडक मोहिमेची गरजकुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रातील नळपाणी योजनेच्या पाण्याचा गैरवापर, पाणीचोरी याला आळा घालण्यासाठी नळयोजनेच्या ज्या भागात पाणी सोडण्यात येते, त्याचवेळी संबंधित विभागातील नळजोडण्यांची पाहणी, तपासणी करण्याची धडक मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. यासाठी ग्रामपंचायत आता पथकाची नियुक्ती करणार की, ही मोहीम कागदावरच राहणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी