शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव परिसरात नळाला पंप, ग्रामपंचायतीकडून घरोघरी सूचनापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:37 IST

रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रात नळपाणी जोडणीला पंप बसवून पाणी वेगात खेचणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे तसेच मीटरच्या आधी असलेल्या जलवाहिनीला टॅब जोडून फुकट पाणी वापरणे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घेतली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीनजीकच्या कुवारबाव परिसरात नळाला पंपग्रामपंचायतीकडून घरोघरी सूचनापत्र

रत्नागिरी : तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रात नळपाणी जोडणीला पंप बसवून पाणी वेगात खेचणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे तसेच मीटरच्या आधी असलेल्या जलवाहिनीला टॅब जोडून फुकट पाणी वापरणे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या पथकातर्फे अशा जोडणीधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांना २५ हजार रुपये दंड आकारला जाणार असून, पाणीपंपही जप्त केले जाणार आहेत.कुवारबाव ग्रामपंचायतीची स्वत:ची नळपाणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात कुवारबावमध्ये गृहसंकुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पाणीजोडण्याही वाढल्या आहेत. त्या तुलनेत एमआयडीसीकडून या नळपाणी योजनेला अधिक पाण्याचा पुरवठा होत नाही. मात्र, गेल्या दोन - तीन वर्षांच्या काळात नळयोजनेच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत.

काहीजण नळजोडणीला पंप जोडून अतिरिक्त प्रमाणात पाणी खेचत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेजारील नळजोडणी धारकांना अल्प प्रमाणात किंवा कमी दाबाने पाणी मिळणे, ही समस्या निर्माण झाली आहे.याबाबत ग्रामपंचायतीकडे काही तक्रारी आल्याने २५ एप्रिल २०१८च्या ग्रामपंचायत सभेत या समस्येवर मात करण्यासाठी १५/१ नंबरने ठराव करण्यात आला आहे. नळजोडणीला पंप बसविणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे किंवा मीटरच्या पाठीमागून अनधिकृतपणे पाणी भरणे, असे प्रकार आढळून आल्यास संबंधित नळजोडणी धारकाला २५ हजार रुपये दंड केला जाणार आहे.

तसेच पाणीपंपही जप्त केला जाईल. संबंधित घर नंबरची नळजोडणी कायमस्वरुपी बंद करण्यात येईल, असे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. याबाबतची सूचना सर्व नळजोडणीधारकांना लेखी स्वरुपात देण्यात आली आहे.धडक मोहिमेची गरजकुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रातील नळपाणी योजनेच्या पाण्याचा गैरवापर, पाणीचोरी याला आळा घालण्यासाठी नळयोजनेच्या ज्या भागात पाणी सोडण्यात येते, त्याचवेळी संबंधित विभागातील नळजोडण्यांची पाहणी, तपासणी करण्याची धडक मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. यासाठी ग्रामपंचायत आता पथकाची नियुक्ती करणार की, ही मोहीम कागदावरच राहणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी