शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
2
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
3
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
4
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
5
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
6
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
7
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
8
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
9
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
10
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
11
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
12
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
13
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
14
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
15
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
16
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
17
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
18
Anudan Scheme: म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
19
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
20
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन खरेदी खत रेंगाळले

By admin | Updated: April 13, 2015 00:09 IST

गुहागर तालुका : तलाठ्यांची होतेय अडचण, खरेदी खत व्यवहारावर परिणाम

गुहागर : गुहागर तालुक्यातील सातबारा संगणकीकरण तसेच खरेदी खत वारस तपास आदी सर्व प्रकारच्या नोंदी आॅनलाईन पद्धतीने करण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. मात्र, महिनाभरात अद्याप एकही खरेदी खत नोंदविले गेले नसल्याने आॅनलाईन कामकाज पद्धत येथील तलाठ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे.सर्वत्र सातबारा संगणीकरण करणे शासनाचा उद्देश आहे. यासाठी रत्नागिरी लांजासह मंडणगड व गुहागर या लहान तालुक्यांची निवड प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे. यासाठी तलाठ्यांना पहिल्या टप्प्यात लॅपटॉप देण्यात आले होते. यासाठी सर्व सातबारे संगणकावर नोंदणी करण्यात आले होते. आता पुढील टप्प्यात नव्याने होणारी खरेदी खते, वारस तपास, फेरफार व इतर सर्व प्रकारच्या नोंदी या आॅनलाईन पद्धतीने करण्यासाठी शासनाने एक विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर बनवून घेतले आहे. हे सॉफ्टवेअर सर्व तलाठ्यांच्या लॅपटॉलपला लोड करण्यात आले असून ते खोलण्यासाठी विशिष्ट कोड देण्यात आले आहे. आॅनलाईन पद्धतीने नोंदी होताना खरेदी खतासह विशिष्ट प्रकारच्या निवडक नोंदीचाच यामध्ये समावेश आहे.
आजच्या स्थितीत अनेक तलाठ्यांना लॅपटॉप हाताळता येत नाही, हे वस्तुस्थिती आहे. अशा तलाठ्यांकडून दुसऱ्या तलाठ्यांना आपले काम करून देण्याची विनवणी करावी लागत आहे. तर नव्याने रुजू झालेले काही तलाठ्यांना संगणक हाताळण्याचे चांगले ज्ञान आहे.
पण प्रत्यक्षात या नोंदी घालताना सॉफ्टवेअरमध्येच काही त्रुटी राहिल्याने या नोंदी घेतल्या जात नाहीत, तर काही नोंदी योग्य प्रकारे झाल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर झाल्यानंतरही प्रत्यक्ष सातबारावर दिसत नाहीत. अशा अनेक वेगवेगळ्या विचित्र अनुभवांमुळे तलाठी हतबल झाले आहेत. एका नोंदीसाठी कधी एक तास तर कधी पाच तास एवढा वेळ देऊनही अखेर हाती काहीच लागत नसल्याने अखेर गुहागर तालुका तलाठी संघटनेने प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
गुहागर तालुक्यात गेल्या महिनाभरात झालेल्या खरेदीखतांमध्ये अद्याप एकही खरेदी खत नोंदवले गेलेले नाही. यामुळे खरेदी खत करणारे तलाठ्यांकडे वारंवार विचारणा करताना दिसत असून शासनाच्या चुकीच्या कामकाज पद्धतीबाबत संताप व्यक्त करत असून याबाबत योग्य सुधारणा केल्यानंतर याची अंमलबजावणी करावी तोपर्यंत जुन्या पद्धतीनेच लेखी नोंदी मंजूर कराव्यात अशी मागणी असून याबाबत पुढे काय होणार याकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)


याबाबतची गंभीर दखल प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी घेतली असून तलाठ्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अशा नोंदी नक्की का होत नाहीत याची प्रत्यक्ष पहाणी करणार असल्याचे समजते. तसेच या संगणीकृत एकमेव असून ते स्वत: येथे येऊन तलाठ्यांना न होणाऱ्या नोंदीबाबत समस्या जाणून घेणार असल्याने लवकरच याबाबत शासनस्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा केली जातआहे. हा निर्णय लवकरच अपेक्षीत असल्याचे बोलले जातेय.