शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

रत्नागिरी : अधिकारीच सरकार चालवत आहेत, माणिकराव ठाकरे यांचा चिपळुणात आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:39 AM

राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिकारीच सरकार चालवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती, आमदार माणिक ठाकरे यांनी केला.

ठळक मुद्देअधिकारीच सरकार चालवत आहेतमाणिकराव ठाकरे यांचा चिपळुणात आरोपउद्धव ठाकरे सोयीने शब्द बदलतात

चिपळूण : राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिकारीच सरकार चालवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती, आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला.एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे चिपळुणात आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील उपस्थित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी या सरकारने जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीतच, उलट जनतेला आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे जनता सरकारला धडा शिकवण्याच्या इराद्याने संधीची वाट पाहात आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी गोंधळलेले आहेत.

एकाही आश्वासनाची पूर्तता होत नाही. जूनमध्ये सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, आजही सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. यादीमध्ये मोठा घोळ आहे. आज शेतकऱ्यांना हमीभावाची मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चुकीच्या धोरणामुळे जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही.

शासनाचे अनेक निर्णय चुकीचे ठरले आहेत. जीएसटी, नोटाबंदी, महागाई अशा सर्वच विषयात सरकार फेल झाले आहे. त्यामुळे या सरकारकडे सांगण्यासारखा एकही चांगला विषय नाही. हजारो शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातला आहे. पाटबंधारे प्रकल्प ठप्प झाले आहेत. चुकीचे धोरण यास कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून हे सरकार सत्तेवर आले. मात्र, तीन वर्षात एकही भ्रष्टाचार सरकारने जनतेसमोर आणला नाही, असेही म्हणाले.उद्धव ठाकरे सोयीने शब्द बदलतातराज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. हे गृहखात्याचे अपयश असून, कोरगाव - भीमाच्या घटनेमध्ये बाहेरच्यांचा हात आहे. त्या दृष्टीने चौकशी व्हायला हवी, असे सांगून सरकारमधील सेनेची भूमिका दुटप्पी आहे. सत्तेत राहण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने सोयीने शब्द बदलतात, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Manikrao Thackreyमाणिकराव ठाकरेRatnagiriरत्नागिरी