शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे उद्या जमा होणार : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 11:56 IST

रत्नागिरी : शासनाकडून महिलांना कोणतीही मदत अथवा सानुग्रह अनुदान दिले जात नाही. कुटुंबाचे आर्थिक नियोजन सांभाळणाऱ्या, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष ...

रत्नागिरी : शासनाकडून महिलांना कोणतीही मदत अथवा सानुग्रह अनुदान दिले जात नाही. कुटुंबाचे आर्थिक नियोजन सांभाळणाऱ्या, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बहिणींना शासनाकडून बक्षीस दिले जात आहे. काही दिवसातच आचारसंहिता लागेल त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे येत्या ९ तारखेलाच खात्यावर जमा होतील, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत साेमवारी शहरातील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे महिला सशक्तीकरण व सक्षमीकरण मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री सामंत बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी श्रीकांत हावळे, मुख्याधिकारी तुषार बाबर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव उपस्थित होते.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, विरोधक ही योजना बंद होण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वाेच्च न्यायालयात गेले परंतु दोन्ही ठिकाणी आमच्या बाजूने निकाल लागला. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांना धडा शिकवण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, सीआरपी, महिला व बाल कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मंत्री सामंत यांनी अभिनंदन केले.शासनातर्फे लेक लाडकी योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातून दि. १३ ऑक्टोबरपर्यंत एक तरी गाडी जायला हवी, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले. यावेळी शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थी महिलांचा मंत्री सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पंधराशेचे दोन हजार करूकितीही अडचणी आल्या तरी योजना बंद पडणार नाही. ती सुरू राहणारच ! उलट पंधराशेचे २ हजार करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा