शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सुसाट; पण पावसाळ्यात धोका कायम

By संदीप बांद्रे | Published: May 04, 2024 3:57 PM

धोकादायक दरडींच्या ठिकाणी उपाययोजना करण्याची आवश्यकता

संदीप बांद्रेचिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्णत्वास गेले आहे. आता घाटातून प्रवास करताना वाहनांचा वेगही वाढला आहे; मात्र अजूनही घाटातील दरड प्रणव क्षेत्रात धोका टळलेला नाही. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे कामही अजून अपूर्ण आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात घाटातील सुरक्षितता समाेर येणार आहे.महामार्ग चौपदरीकरणात परशुराम घाटातील काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले. चौपदरीकरणातील जमिनीच्या मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा आजतागायत सुटलेला नाही. सुरुवातीला प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नव्हता; मात्र त्यानंतर अत्यंत घाईघाईने काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचे परिणाम मागील वर्षी पहिल्याच पावसात दिसले. अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाचा भाग खचला हाेता. विशेषतः घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. त्या ठिकाणी नव्याने काँक्रीटीकरणाचे काही महिन्यांपूर्वीच पूर्ण केले.या घाटातील अतिशय अवघड टप्पा चिपळूण हद्दीत, उर्वरित भाग महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हद्दीत येतो. महाड हद्दीत कल्याण टोलवेज कंपनीकडून सुरू असलेल्या कामावर अखेरचा हात फिरवला असला, तरी त्या ठिकाणी अजूनही किरकोळ स्वरूपाची कामे शिल्लक आहेत; मात्र चिपळूण हद्दीत काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असले, तरी या ठिकाणी दरडीची उंची अधिक असल्याने तेथे पायरी पद्धतीने रचना करण्याची मागणी केली जात आहे.तूर्तास दरडीचा धोकाही कायम आहे; मात्र आता संबंधित कंपनीने चिपळुणातील यंत्रणा संगमेश्वर हद्दीतील कामात गुंतल्याने परशुराम घाटातील कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी काही महत्त्वाच्या उपाययोजना न केल्यास यावर्षीही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार आहे; तसेच पायथ्यालागतच्या घरांचाही धोका टळलेला नाही. आता दोन्ही मार्गांवर वाहतूक सुसाट सुरू झाली असली, तरी दरडीची उंची लक्षात घेता दोन्ही मार्गांवरील धोका टळल्याची खात्री अजून तरी ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेली नाही.

अजूनही महाड हद्दीत किरकोळ काम शिल्लक असून पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल; मात्र दरडीचे टप्पे तयार करण्यासाठी जागा अपुरी आहे. त्यामुळे काम थांबले आहे. मात्र, त्या ठिकाणची गटारातील माती व अन्य साफसफाई तातडीने केली जाणार आहे. - आर. पी. कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग