शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

मराठी भाषा खाते संस्कारक्षम महाराष्ट्राला ताकद देणारे : मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:29 IST

मराठी माणसाला त्रास दिल्यास कारवाई

रत्नागिरी : मराठी भाषा हे खाते अतिशय संवेदनशील आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने भावनिक आहे. या खात्याकडे सगळ्यांनी अतिशय डाेळसपणे बघण्याची आवश्यकता आहे. संस्कारक्षम महाराष्ट्राला ताकद देणारे हे खाते आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी हे उपयुक्त खात आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पाली (ता. रत्नागिरी) येथे पत्रकार परिषदेत दिली.त्यांनी सांगितले की, या खात्यामार्फत मराठी विद्यापीठ, चार महामंडळ चालविली जातात. अखिल भारतीय साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन या खात्यामार्फत हाेतात. या खात्याशी साहित्यिकांचा, कलाकारांचा संबंध येताे. या खात्यामार्फत मराठी वाङमय पुरस्कार दिले जातात. मराठी भाषेच्यानिमित्ताने तालुकास्तरापर्यंत चांगले उपक्रम राबविण्यासाठी आम्ही यशस्वी ठरू, असे ते म्हणाले.

केंद्रशासनाकडून अभिजात भाषेची जी यंत्रणा आहे, त्यामधून जाे निधी मिळवायचा आहे, ताे कराेडाे रुपयांचा निधीही महाराष्ट्रासाठी मिळवू, असे मंत्री सामंत म्हणाले. जास्तीत जास्त व्यवहारामध्ये मराठी भाषेचा उपयाेग झाला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे कार्यरत राहू. मराठी भाषा विभागाचा वर्षभराचा आराखडा तयार केला जाणार आहे.जिल्ह्यात पुस्तकांचे गाव करायचे आहे, कवितांचे गाव करायचे आहे, जिल्हानिहाय साहित्य संमेलन घ्यायची आहेत, युवा साहित्यिक, युवा कवी, युवा लेखक तयार करायचे आहेत. मराठी भाषेच खात महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी उपयुक्त आहे. शालेय शिक्षणापर्यंत मराठी, व्यवहारात मराठी, न्यायालयामध्ये मराठी भाषा अशा प्रकारचे विविध उपक्रम घेऊन मराठी भाषेचे काम करणार आहाेत.

मराठी माणसाला त्रास दिल्यास कारवाईमहाराष्ट्र सर्व जाती, धर्मांनी, पंथांनी जरी नटलेला असला, तरी मराठी माणसाला त्रास देणे किती महागात पडू शकते, हे शासनाने दाखविले आहे. मराठी माणसाला न्याय देण्यासाठीच महायुतीचे सरकार आहे, मराठी माणसाला जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका काेणी घेत असेल, तर त्याच्यावर कठाेर कारवाई केली जाईल ही शासनाची भूमिका आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत