शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात पाहिलेला विकास मला कोकणात करायचाय - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:24 IST

गुहागर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे महाराष्ट्राला पोसू शकतात. केरळ गोवा ही राज्य पर्यटनावर चालू आहेत, ...

गुहागर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे महाराष्ट्राला पोसू शकतात. केरळ गोवा ही राज्य पर्यटनावर चालू आहेत, त्या सर्वांना मागे टाकून महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. जगभरात मी जो विकास पाहिला आहे, तो मला कोकणात करून कोकण सुंदर करायचे आहे. यासाठी निवडणुकीनंतर मी कोकणात येणार आहे, असे उद्गार राज ठाकरे यांनी काढले.गुहागर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारार्थ पाटपन्हाळे हायस्कूल पटांगणात झालेल्या सभेत ते बोलत होते.राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही कोकणात राहणारे भाग्यवान आहात, इतका चांगला निसर्ग तुम्हाला मिळाला आहे. पण आजवर तुम्ही चुकीची माणसे निवडलीत, हे तुमचे दुर्भाग्य आहे. निवडून दिलेली माणसे मोठे झाली, पण या भागात काही आलेच नाही. विदर्भ मराठवाड्याप्रमाणे कोकणातही उद्योगधंदे नसल्याने येथील लोकांना मुंबई, पुणेकडे जावे लागते. ७५० किलोमीटरची किनारपट्टी असूनही पर्यटन विकास होत नाही. येथे येतात ते रिफायनरी व वीज प्रकल्प.याच जमिनीवर मी तुमचा उत्कर्ष करून दाखवू शकतो. जगामध्ये ते पाहिले ते मला इथे करायचंय, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखविली.यावेळी व्यासपीठावर प्रमोद गांधी, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, संतोष नलावडे, विनोद जानवळकर, सुनील हळदणकर, सुनील पात्रे, नितीन साठे, सचिन गायकवाड उपस्थित होते.जमिनी विकू नकाआता शत्रू समुद्रमार्गे नाही, तर जमिनीवरून येत आहे. तुमच्या जमिनी विकत घेऊन तुम्हाला अस्तित्वहीन करण्याचे काम राजकारणी दलाल करीत आहेत. नाणार प्रकल्प रद्द करून बारसू प्रकल्पासाठी पाच हजार एकर जमीन लगेचच उपलब्ध कशी झाली. प्रकल्प येण्याआधीच राजकीय दलाल अशा जमिनी घेऊन ठेवतात. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपले, हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले.आमदार जाधव यांच्याबद्दल मौनसरकारी धोरणांवर टीका करताना राज ठाकरे यांनी विरोधी पक्षातील आमदार भास्कर जाधव यांच्यावर मात्र कोणतेही विधान केले नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४guhagar-acगुहागरMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे