शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

जगभरात पाहिलेला विकास मला कोकणात करायचाय - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:24 IST

गुहागर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे महाराष्ट्राला पोसू शकतात. केरळ गोवा ही राज्य पर्यटनावर चालू आहेत, ...

गुहागर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे महाराष्ट्राला पोसू शकतात. केरळ गोवा ही राज्य पर्यटनावर चालू आहेत, त्या सर्वांना मागे टाकून महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. जगभरात मी जो विकास पाहिला आहे, तो मला कोकणात करून कोकण सुंदर करायचे आहे. यासाठी निवडणुकीनंतर मी कोकणात येणार आहे, असे उद्गार राज ठाकरे यांनी काढले.गुहागर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारार्थ पाटपन्हाळे हायस्कूल पटांगणात झालेल्या सभेत ते बोलत होते.राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही कोकणात राहणारे भाग्यवान आहात, इतका चांगला निसर्ग तुम्हाला मिळाला आहे. पण आजवर तुम्ही चुकीची माणसे निवडलीत, हे तुमचे दुर्भाग्य आहे. निवडून दिलेली माणसे मोठे झाली, पण या भागात काही आलेच नाही. विदर्भ मराठवाड्याप्रमाणे कोकणातही उद्योगधंदे नसल्याने येथील लोकांना मुंबई, पुणेकडे जावे लागते. ७५० किलोमीटरची किनारपट्टी असूनही पर्यटन विकास होत नाही. येथे येतात ते रिफायनरी व वीज प्रकल्प.याच जमिनीवर मी तुमचा उत्कर्ष करून दाखवू शकतो. जगामध्ये ते पाहिले ते मला इथे करायचंय, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखविली.यावेळी व्यासपीठावर प्रमोद गांधी, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, संतोष नलावडे, विनोद जानवळकर, सुनील हळदणकर, सुनील पात्रे, नितीन साठे, सचिन गायकवाड उपस्थित होते.जमिनी विकू नकाआता शत्रू समुद्रमार्गे नाही, तर जमिनीवरून येत आहे. तुमच्या जमिनी विकत घेऊन तुम्हाला अस्तित्वहीन करण्याचे काम राजकारणी दलाल करीत आहेत. नाणार प्रकल्प रद्द करून बारसू प्रकल्पासाठी पाच हजार एकर जमीन लगेचच उपलब्ध कशी झाली. प्रकल्प येण्याआधीच राजकीय दलाल अशा जमिनी घेऊन ठेवतात. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपले, हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले.आमदार जाधव यांच्याबद्दल मौनसरकारी धोरणांवर टीका करताना राज ठाकरे यांनी विरोधी पक्षातील आमदार भास्कर जाधव यांच्यावर मात्र कोणतेही विधान केले नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४guhagar-acगुहागरMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे