शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात पाहिलेला विकास मला कोकणात करायचाय - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:24 IST

गुहागर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे महाराष्ट्राला पोसू शकतात. केरळ गोवा ही राज्य पर्यटनावर चालू आहेत, ...

गुहागर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे महाराष्ट्राला पोसू शकतात. केरळ गोवा ही राज्य पर्यटनावर चालू आहेत, त्या सर्वांना मागे टाकून महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. जगभरात मी जो विकास पाहिला आहे, तो मला कोकणात करून कोकण सुंदर करायचे आहे. यासाठी निवडणुकीनंतर मी कोकणात येणार आहे, असे उद्गार राज ठाकरे यांनी काढले.गुहागर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारार्थ पाटपन्हाळे हायस्कूल पटांगणात झालेल्या सभेत ते बोलत होते.राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही कोकणात राहणारे भाग्यवान आहात, इतका चांगला निसर्ग तुम्हाला मिळाला आहे. पण आजवर तुम्ही चुकीची माणसे निवडलीत, हे तुमचे दुर्भाग्य आहे. निवडून दिलेली माणसे मोठे झाली, पण या भागात काही आलेच नाही. विदर्भ मराठवाड्याप्रमाणे कोकणातही उद्योगधंदे नसल्याने येथील लोकांना मुंबई, पुणेकडे जावे लागते. ७५० किलोमीटरची किनारपट्टी असूनही पर्यटन विकास होत नाही. येथे येतात ते रिफायनरी व वीज प्रकल्प.याच जमिनीवर मी तुमचा उत्कर्ष करून दाखवू शकतो. जगामध्ये ते पाहिले ते मला इथे करायचंय, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखविली.यावेळी व्यासपीठावर प्रमोद गांधी, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, संतोष नलावडे, विनोद जानवळकर, सुनील हळदणकर, सुनील पात्रे, नितीन साठे, सचिन गायकवाड उपस्थित होते.जमिनी विकू नकाआता शत्रू समुद्रमार्गे नाही, तर जमिनीवरून येत आहे. तुमच्या जमिनी विकत घेऊन तुम्हाला अस्तित्वहीन करण्याचे काम राजकारणी दलाल करीत आहेत. नाणार प्रकल्प रद्द करून बारसू प्रकल्पासाठी पाच हजार एकर जमीन लगेचच उपलब्ध कशी झाली. प्रकल्प येण्याआधीच राजकीय दलाल अशा जमिनी घेऊन ठेवतात. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपले, हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले.आमदार जाधव यांच्याबद्दल मौनसरकारी धोरणांवर टीका करताना राज ठाकरे यांनी विरोधी पक्षातील आमदार भास्कर जाधव यांच्यावर मात्र कोणतेही विधान केले नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४guhagar-acगुहागरMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे