शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलाचा आंबा पिकावर परिणाम, थंडी पडूनही नवीन मोहोर नाही; बागायतदार चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 11:56 IST

जानेवारी संपत आला तरी नवीन मोहोर येण्यास अजून सुरुवात झालेली नाही. शिवाय अधूनमधून थंडीही गायब असल्याने बागायतदारांसमोर समस्या

रत्नागिरी : जगभरात प्रसिद्ध हापूसच्या उत्पादनावर हवामानातील बदलाचा परिणाम होत आहे. पहिल्या टप्प्यात जेमतेम दहा टक्केच आंबा आला असून, थंडी चांगली पडूनही अद्याप नवीन मोहोर नसल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे.यावर्षी पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण अधिक होते. ९० टक्के झाडांना पालवी होती. जेमतेम दहा टक्केच मोहोर होता. या मोहोराचा आंबा १५ मार्चपर्यंत बाजारात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा १५ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत असेल. हा आंबा सध्या सुपारी ते सफरचंदाच्या आकाराचा आहे.डिसेंबरमध्ये थंडी गायब होती. जानेवारीत थंडी सुरू झाली. आठवडाभर थंडीचा जोर कायम आहे. परंतु, मध्येच ढगाळ हवामान, उष्मा, परत थंडी असे विचित्र हवामान असल्याने दुसऱ्या टप्प्यात मोहोर आलाच नाही. जानेवारी संपत आला तरी नवीन मोहोर येण्यास अजून सुरुवात झालेली नाही. शिवाय अधूनमधून थंडीही गायब असल्याने बागायतदारांसमोर समस्या निर्माण झाली आहे. अनेक बागांमधील पालवी जुनी झाली असून, मोहर येणे गरजेचे आहे.हवामानातील बदलामुळे तुडतुडा, थ्रीप्स, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हवामानातील बदलाचा अंदाज घेत बागायतदारांनी महागडी कीटकनाशके वापरून पालवीचे संरक्षण केले आहे.जानेवारीत कडाक्याची थंडी सुरू झाली. परंतु मध्येच थंडी गायब होत आहे. फेब्रुवारीपर्यंत तरी मोहर येणे आवश्यक आहे. अन्यथा बागायतदारांसह मजुरांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. अनेक बागायतदार आंबा काढण्यासाठी बागा किंवा झाडे कराराने घेतात. मात्र, माेहोरच नसल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे.

अनेक बागा कोऱ्यापालवी मोठ्या प्रमाणावर असल्याने महागडी कीटकनाशके वापरून कीडरोग, बुरशीपासून पालवीचे संरक्षण करण्यात बागायतदार यशस्वी ठरले. पालवी जुनी झाली असून पानांचा रंग बदलला आहे. मात्र मोहोर सुरू न झाल्याने बागा अद्याप कोऱ्याच आहेत. पुरेशी थंडी नसल्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झालेली नाही.

हवामानातील बदलाचा आंबा पिकावर होणारा परिणाम व आंबा पीक वाचविण्यासाठी येणारा खर्च यामुळे आंबा पीक खर्चीक बनत आहे. तुलनेने आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावू लागले आहे. शिवाय अपेक्षित दरही मिळत नसल्याने आर्थिक गणिते कोलमडत आहेत. कीटकनाशकांचे दर मात्र वाढतच आहेत. त्यामुळे शासनाने आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत विचारविनिमय करणे आवश्यक आहे. - राजन कदम, बागायतदार.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाFarmerशेतकरीweatherहवामान