शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विमानसेवा बंद असल्यामुळे आंबा निर्यातीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असतानाही परदेशातून आंब्याला चांगली मागणी होत असताना कोरोनामुळे दि. ३० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असतानाही परदेशातून आंब्याला चांगली मागणी होत असताना कोरोनामुळे दि. ३० एप्रिलपर्यंत विमान वाहतूक सेवा बंद करण्यात आली असल्याने निर्यातीलाही ब्रेक लागले आहेत. मात्र दिल्लीतून आंब्याला चांगली मागणी होत आहे. नुकताच १८०० डझन आंबा दिल्लीत पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत रत्नागिरीतून दिल्लीमध्ये सात हजार दोनशे डझन आंबा पाठविण्यात आला आहे.

आंबा उत्पादन कमी असल्याने निर्यातीवर परिणाम झाला असतानाच आता विमानसेवा बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडील दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला आहे. परदेशांतून मागणी चांगली होती. आतापर्यंत कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन, तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात झाला आहे. दिल्लीसाठी एकूण सात हजार २०० डझन आंबा पाठविण्यात आला आहे.

पणन विभागाच्या माध्यमातून सद्गुरू एंटरप्रायझेसतर्फे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येऊन रत्नागिरीतून थेट निर्यात करण्यात येत होती. त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत होता; मात्र कोरोनामुळे परदेशातील विमानसेवा दि. ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे थेट निर्यात बंद ठेवण्यात आली आहे.

....................

अपेडाच्या मान्यतेने सद्गुरू एंटरप्रायझेसतर्फे येथील शेतकऱ्यांना जाग्यावरच चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी जगातील विविध देशांपर्यंत आंबा पोहोचावा, यासाठी थेट निर्यातीवर भर देण्यात आला होता. सध्या विमानसेवेमुळे निर्यात बंद असली तरी दिल्लीसह मुंबई व अन्य राज्यांत आंबा विक्रीसाठी सद्गुरू एंटरप्रायझेसचे प्रयत्न सुरू आहेत.

- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सद‌्गुरू एंटरप्रायझेस