शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

..पण गायींचा सांभाळ करायचा तरी कसा? गोहत्या बंदीमुळे गोशाळा फूल्ल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 13:57 IST

सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. गाय कामधेनू आहे, तिला मातेचे स्थान दिले आहे, त्यामुळे तिची हत्या करू नये, यासाठी हा कायदा केला गेला. त्याचे स्वागतही झाले. कधीकाळी कत्तलखात्याकडे जाणा-या गायींना आता गोशाळेचा मार्ग दाखवला जात आहे.

- शिवाजी गोरे 

दापोली : सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. गाय कामधेनू आहे, तिला मातेचे स्थान दिले आहे, त्यामुळे तिची हत्या करू नये, यासाठी हा कायदा केला गेला. त्याचे स्वागतही झाले. कधीकाळी कत्तलखात्याकडे जाणा-या गायींना आता गोशाळेचा मार्ग दाखवला जात आहे. पण त्याने प्रश्न सुटला आहे का? गेल्या काही वर्षात गोशाळांमधील गायींची विशेषत: भाकड गायींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि आता त्यांच्या पालनाचा मोठा प्रश्न गोशाळा चालकांसमोर उभा राहिला आहे. गोशाळांसाठी प्रत्येक जिल्ह्याला अनुदान देण्याचा निर्णय अजूनही कागदावरच असल्याने गायींचे पालन करायचे कसे, असा प्रश्न गोशाळा चालकांना पडला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे -परशुराम येथील कर्मवीर श्रीहरी भक्त पारायण भगवान कोकरे महाराज यांची श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान या नावाची  गोशाळा आहे. ही गोशाळा २००८ साली सुरू झाली होती. सुरुवातीला या गोशाळेत केवळ ४ गायी होत्या. मात्र, गोवंश हत्याबंदी कायदा आल्यानंतर या गोशाळेतील गायींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. कत्तकखान्याकडे जाणाऱ्या व अपघातात जखमी झालेल्या गायींची त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे आता या गोशाळेतील गायींची संख्या चारशे पन्नास झाली आहे. या भाकड गायीच्या संगोपनाचा खर्च करताना तारेवरची कसरत कोकरे महाराज यांना करावी लागत आहे. या भाकड गायींच्या संगोपनासाठी त्यांनी कीर्तनसेवेचा आधार घेतला आहे. कीर्तनसेवेच्या माध्यमातून  मिळणाऱ्या मानधनातून ते या गोशाळेचा गाडा हाकत आहेत. त्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा त्यांना आहे.

गोवंश हत्याबंदी करून सरकारने जबाबदारी  झटकली. त्यामुळे गो मातेच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी आता गोशाळेवर येऊन पडली आहे. नोटबंदीनंतर अनेक आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे गोशाळेला समाजाकडून मिळणाºया मदतीचा ओघही कमी झाला आहे.

गायींच्या मृत्यूचे पाप नको

राज्यातील गोशाळांची भयावह स्थिती आहे. गोवंश हत्याबंदी कायदा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याला १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे . गोशाळेला अनुदान देण्यासंदर्भात प्रस्तावही मागविण्यात आले आहेत. मात्र, मागविण्यात आलेले प्रस्ताव धूळखात पडले आहेत. गोशाळा चालकांना गायीच्या संगोपनाकरिता मदतीची अत्यंत गरज आहे. परंतु, शासनाकडून अजूनही मदत मिळालेली नाही. आता आम्हीच आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. गायीच्या मृत्यूचे पाप डोक्यावर घेऊन जगण्यापेक्षा मरण पत्करेन.

- भगवान कोकरे महाराज

गोशाळेतील गायींची संख्या वाढली

भाकड गायी कत्तलखान्याला विकल्या जात होत्या. परंतु, भगवान कोकरे महाराजांच्या गोशाळेमुळे भाकड गायींना हक्काचा आसरा मिळाला. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या  गायी गोशाळेत दाखल होऊ लागल्या. ज्या शेतकऱ्यांना गायी सांभाळणे शक्य होत नाही, ते या गोशाळेत आणून सोडतात. गोशाळेत त्यांचे संगोपन व्यवस्थित होत आहे. चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायी पोलिसांच्या मदतीने सोडवून गोशाळेत ठेवल्या जात आहेत.

स्थानिक जातींचेच संगोपन व्हावे

गुजरात व राज्यस्थानमधून गायी आणून काही गोशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सरकारकडे अशा गोशाळा अनुदानाकरिता प्रस्तावही सादर झाले आहेत. मात्र, परराज्यातील गायी आणून गोशाळा काढण्यापेक्षा महाराष्ट्रीयन गायींचे संगोपन झाले पहिले, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

रोज एक ट्रक पेंढा

श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान संचलित गोशाळा लोटे - परशुराम येथे साडेचारशे गायी आहेत. या गायींना पेंढा (सुकलेले गवत) विकत घेऊन घालावे लागते. दररोज एक ट्रक पेंढा घ्यावा लागतो.  वणवा लावला गेल्याने आजूबाजूच्या परिसरातीत सगळे गवत जळून गेले आहे. वणवा लागला नसता तर कदाचित या गायींना जंगलातील वाळलेला चारा तरी मिळाला असता. मात्र द्वेषापोटी आजूबाजूचा परिसर जाळला जात असून, गायींना पेंढा विकत घेण्याची वेळ गोशाळेवर आली आहे.

समाजाचा पुढाकार हवा

गायी जगल्या पाहिजेत, त्यांचे योग्य संगोपन झालं पाहिजे. गायीला मातेचा दर्जा आहे. त्यामुळे तिची हत्या रोखण्यासाठी आणि तिच्या संगोपनासाठी समाजातील प्रत्येक घटकानेच पुढे यायला हवे आणि गोशाळांना मदत करायला हवी, अशी अपेक्षा कोकरे महाराजांनी व्यक्त केली आहे. केवळ आर्थिक मदतच नाही तर पेंढा, भुशी, औषध, गूळ, पाणी अशी कोणत्याही स्वरूपात मदत मिळाली तर गोशाळेला त्याचा उपयोग होईल, असे ते म्हणाले.

खर्च परवडण्यापलिकडचा

कोकरे महाराज यांच्याकडे १२ कामगार आहेत. या गायींना दररोज एक ट्रक पेंढा लागतो. त्यामुळे महिन्याचा खर्च साडेचार लाख रूपयांवर जातो. त्यामुळेच आता गोशाळा चालवणे अवघड होऊ लागले आहे. कोकरे महाराजांनी गायींच्या संगोपनासाठी बँकेकडून १५ लाख रुपये कर्ज काढले. आपली जमीन विकली, पत्नीचे मंगळसूत्रही गहाण ठेवले. 

संगोपन सोडणार नाही

कठीण परिस्थितीतही एकही गाय कत्तलखान्यात जाऊ नये, अशी कोकरे महाराज यांची इच्छा आहे. त्यासाठी अखेरपर्यंत आपण गायींचे संगोपन करतच राहू, असे ते सांगतात. शेतकऱ्याला गायीचे संगोपन करता येत नसेल त्यांनी  गोशाळेत आणून सोडावी. जेव्हा गाय हवी असेल तेव्हा शेतकरी ती परत घेऊ जाऊ शकतात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.