शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

होमगार्डस्ना ना मान, ना धन; विविध प्रकारे उपेक्षा

By admin | Updated: November 22, 2014 00:13 IST

सरकारकडून अपेक्षा : आर्थिक उपेक्षा थांबणार कधी हा प्रश्न अनुत्तरीतच

श्रीकांत चाळके - खेड --राज्यातील वाढत्या दहशतवादाला तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दल कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. अशातच गृहरक्षक दलाचे महत्त्व विविध प्रकारे वाढले आहे. मात्र, आजही राज्य सरकारकडून होमगाडर््सची विविध प्रकारे उपेक्षा केली जात आहे. याची गंभीर दखल नव्या सरकारने घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.आपद्ग्रस्त परिस्थिती तसेच विविध धार्मिक सणासाठी होमगार्ड्सना कर्तव्यावर बोलावले जाते. यावेळी कर्तव्यावर असतानाच भत्ता दिला जातो. मात्र, इतर वेळी होमगार्ड्सना घरी बसावे लागते. त्यांना मजुरीची कामेही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे होमगाडर््सच्या या भत्त्यात वाढ करून धुलाई भत्ता वाढवून देण्याची जाहीर घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप होमगाडर््सना कोणत्याही सुविधेचा लाभ झाला नाही. आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या होमगार्ड्सना ना मान ना धन अशा स्थितीत काम करावे लागत आहे. शासकीय कर्तव्यावर असताना पोलिसांप्रमाणे दिवस-रात्र कर्तव्य पार पाडावे लागत आहे़ हे कमी म्हणून की काय, ज्या पोलीस हवालदारांसमवेत कर्तव्यावर पाठविले जाते, त्याची खासगी कामेही यांच्याकडून करून घेतली जातात. पान, सुपारी आणण्यापासून ते चहावाल्याला चहा आण म्हणून सांगण्यास जाण्यासाठी होमगार्ड्सचा वापर केला जातो. कर्तव्य पोलिसांप्रमाणे असले तरी वर्दीप्रमाणे अधिकार नसल्याने होमगाडर््सना मागासलेपणाची जाणीव होत राहाते. एवढे सहन करूनही होमगार्ड्सना पगार देतानाही सरकार हात आखडता घेते, याविषयी प्रचंड नाराजी आहे. होमगाडर््सना प्रतिमहिना निश्चित समाधानी पगार किंवा मानधन मिळाल्यास चरितार्थ चालविणे सुलभ होऊ शकेल. सद्यस्थितीतील होमगार्डना मिळणारे अधिकार पुरेसे नसल्याने जनतेकडून मिळणारा मान तितकासा समाधानकारक नाही. शिवाय कर्तव्याच्या प्रमाणात धन पुरेसे नसल्याने होमगाडर््स कायमस्वरूपी चिंताग्रस्त आहेत. ‘ना मान ना धन’ अशा विपरीत अवस्थेत होमगाडर््स आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे़ याकामी आता शासनाने पुढाकार घेऊन होमगार्डना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. याकडे सरकार लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.गृहरक्षक दलाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी गेले अनेक दिवस करण्यात येत आहे. त्यांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने ते कधी सोडविणार, असा प्रश्न विचारला जात आहे. कर्तव्य भावनेतून हे आवश्यक आहे.