शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

हापूसला हॉलंड बाजारपेठ खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:56 IST

रत्नागिरी : हापूसच्या उत्कृष्ट चवीमुळे परदेशातील ग्राहकांनादेखील त्याची भुरळ पडली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, रशिया, आॅस्ट्रेलिया, दुबई येथे हापूसला ...

रत्नागिरी : हापूसच्या उत्कृष्ट चवीमुळे परदेशातील ग्राहकांनादेखील त्याची भुरळ पडली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, रशिया, आॅस्ट्रेलिया, दुबई येथे हापूसला मागणी आहे. गतवर्षीपासून युरोप, कॅनडा, रशिया येथूनही मागणी नोंदविण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच हॉलंडमधून हापूसची मागणी करण्यात आली आहे. ५०० टन हापूस आंब्याची मागणी हॉलंडने केली आहे.प्रत्येक देशाच्या मागणीनुसार आंब्यावर प्रक्रिया करुन आंबा निर्यात केला जातो. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्वाधिक आंबा हा मुंबईतील वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो. वाशी बाजारमधून विविध देशांमध्ये हा आंबा निर्यात केला जातो. वाशी बाजारात पणन मंडळातर्फे नवीन रेडिएशन प्लान्ट उभारण्यातआला आहे. या प्लान्टमध्ये आंब्यावर उष्णजल, बाष्पजल प्रक्रिया करण्यात येते. रत्नागिरीतील हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रामध्ये उष्णजल प्रक्रिया करुन आंबा निर्यात करण्यात येतो. हॉलंड येथील पथकाने रत्नागिरीच्या आंबा निर्यात केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी ५०० टन हापूसची मागणी नोंदवली आहे.यावर्षी आंबा कमी असताना त्याला परदेशातून मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, आंब्याला चांगला दर मिळावा यासाठी मँगोनेट सुविधा सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षात मॅगोनेटद्वारे शेतकऱ्यांनी परदेशात आंबा निर्यात केला होता. बहुतांश शेतकरी वाशी बाजारावर विसंबून असतात. वाशी बाजारात आंबा येण्याचे प्रमाण वाढले की, त्याचे दर कोसळतात. यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादन कमी आहे. उत्पादन कमी असूनही समाधानकारक दर नाही. त्यामुळे आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च भरून काढणे शेतकऱ्यांना कष्टदायक बनले आहे. हॉलंडने आपली बाजारपेठ खुली केली असल्याने शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे. परदेशात आंबा पाठवण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. कीटकनाशक रेसिड्यू फ्री असलेल्या आंब्याची निवड करण्यात येते. आंबा पिकावर हवामानामुळे होणारे परिणाम व रेसिड्यू फ्री कीटक नाशकांसाठी कृषी विद्यापीठातर्फे संशोधन होणे गरजेचे आहे.परदेशवारीपूर्वी तपासणी वाशीत उष्णजल, बाष्पजल प्रक्रियापरदेशात आंबा पाठवण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. वाशी बाजारात पणन मंडळातर्फे नवीन रेडिएशन प्लान्ट उभारण्यातआला आहे. या प्लान्टमध्ये आंब्यावर उष्णजल, बाष्पजल प्रक्रिया करण्यात येते.