शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरतीनंतरही ९८६ पदे राहणार रिक्त, नव्या शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षकांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 13:18 IST

तात्पुरते भरण्यात आलेल्या सुमारे ७०० शिक्षकांचे काम बंद करण्यात आले

रत्नागिरी : जिल्ह्यात शिक्षकांची २ हजार पदे रिक्त असतानाही केवळ १ हजार ६८ पदांची भरती करण्यात येणार आहे. या शिक्षक भरतीमुळे तात्पुरते भरण्यात आलेल्या सुमारे ७०० शिक्षकांचे काम बंद करण्यात आले आहे. त्यातच नव्याने भरती प्रक्रिया राबविल्यानंतरही शिक्षकांची ९८६ पदे रिक्तच राहणार आहे. त्यामुळे रिक्त पदांचा डाेलारा सांभाळत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे आव्हान शिक्षण विभागाला पेलावे लागणार आहे.गेली १० ते १२ वर्षे नव्याने शिक्षक भरती झालेली नाही. त्यातच निवृत्त हाेणारे शिक्षक, आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्याही फार मोठी असल्याने दरवर्षी रिक्त पदांचा आलेख वाढत चालला आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हाेऊ लागला. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणीही पालकांकडून सातत्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे करण्यात येत होती. पण, ही मागणी केवळ ऐकण्यापुरतीच मर्यादित राहत हाेती.

शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा शासनाला मुहूर्त मिळाला असून, जिल्ह्यात शिक्षकांची १ हजार ६८ पदे भरण्यात येणार आहेत. त्यातही ५४ उमेदवार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे आता केवळ १ हजार १४ पदांची भरती होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांची ९८६ पदे रिक्त राहणार आहेत. ही पदे कधी भरणार, असाही प्रश्न पालकांकडून करण्यात येत आहे.

आधी बदली मग नियुक्तीशिक्षक भरती करण्यात येत असतानाच पूर्वीच्या शिक्षकांच्या तालुका अंतर्गत बदल्या झाल्याशिवाय नवीन शिक्षकांना शाळा देऊ नयेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. त्यामुळे आधी पूर्वीच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

आचारसंहितेचा फटकाशिक्षक भरतीच प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नवीन भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. निवडणुकीनंतर काही प्रमाणात आचारसंहिता शिथिल करण्यात आली हाेती. पण, त्यानंतर काेकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी नव्याने आचारसंहिता लागू करण्यात आली. ही निवडणूक पार पडल्यानंतर १० जूननंतरच शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अद्याप नियुक्तीपत्रे नाहीतशिक्षक भरती सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन भरती होणाऱ्या शिक्षकांचे नुकसान झाले. केवळ समुपदेशनाद्वारे शाळांवर नियुक्ती देण्याचे काम शिक्षण विभागाकडून शिल्लक राहिले होते. मात्र, निवडणुकीमुळे शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. त्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शनही मागविले होते.

काम बंदच्या सूचनाशिक्षक भरतीची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली असल्याने तात्पुरत्या घेण्यात आलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून काम बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांना येत्या शैक्षणिक वर्षापूर्वीच कमी करण्यात आले. मात्र, त्या शिक्षकांना मुदतवाढ दिली असती तर रिक्त पदांची कसर भरून निघाली असती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाTeacherशिक्षक