शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एस्टीला थांबा तोट्याचा

By admin | Updated: August 31, 2015 21:23 IST

प्रवाशांकडे दुर्लक्ष : कर्मचारी-प्रशासनात ताळमेळाचा अभाव

श्रीकांत चाळके - खेड  दिवसागणिक तोट्यात सुरू असलेली एस. टी. आता विविध समस्यांनी ग्रासली आहे़ एस. टी. नफ्यात आणण्यासाठी आता एस. टी. महामंडळाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत़ एका बाजूला एस. टी. चालकांच्या मनमानीमुळेच अनेक प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत असतानाच चालकांच्या या बेशिस्त वर्तनाकडे डोळेझाक करीत एस. टी. प्रशासन नेमके काय साधणार आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील बहुतेक मार्गावर धावणाऱ्या एस. टी. बसेस प्रशासनाने दिलेल्या थांब्यावर थांबवल्या जात नाहीत. काहीवेळा तर एस. टी. रिकामी असली तरीही प्रवाशांना न घेता निघून जाते़ दोन वर्षापूर्वी एस. टी.ने ‘हात दाखवा आणि थांबवा,’ अशी योजना अंमलात आणली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यातच या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. एस. टी.चे चालक गाडी रिकामी असली तरीही थांबवत नाहीत. विशेषत: अनेक शाळकरी मुलांच्या बाबतीतही हा अनुभव येतो. अनेकवयोवृध्द आजही एस. टी. प्रवासावर अवलंबून आहेत. शासनाने दिलेल्या एस. टी. सवलतीचा लाभ घेत हे वृध्द किंवा जेष्ठ नागरिक एस. टी.नेच प्रवास करीत असतात़ मात्र, या वृध्दांनाही चालक एस. टी. थांबवत नसल्याचा कटू अनुभव येत आहे. सर्वसामान्यांना परवडणारी आणि सर्वांचाच आधार असलेली एस. टी.ची सेवा आजच्या युगात आधारवड ठरली आहे. एस. टी.च्या पारंपरिक वेशभुषांकडे अनेक प्रवाशांनी दुर्लक्ष केल्याने महामंडळाने या बसेसच्या मदतीला काही आगारांमध्ये मिडीबसेस आणि काही नवीन सुविधायुक्त अशा बसेस आणल्या़ तरीही बससेवा तोट्यात चालली आहे. त्यामुळे आता महामंडळच याबाबत गंभीर बनले आहे.गतवर्षी महामंडळाने याबाबत मास्टर प्लॅनही तयार केला़ यापूर्वीची ‘हात दाखवा व एस. टी. थांबवा’ याच योजनेची पुनरावृत्ती करण्याचा निर्णय घेत आणखी काही नव्या योजनांना जन्म दिला. मात्र, एस. टी. चालकांच्या वागण्याने या योजनांचेही तीनतेरा वाजले. एखादी बस रिकामी असल्यास चालक बस थांबवत नाहीत, असे प्रकार सातत्याने होत आहेत आणि एस. टी. तोट्यात जाण्याचे हेच प्रमुख कारण आहे. प्रवाशाने हात केरुनही बस न थांबल्यास तेवढ्याच प्रवास खर्चात प्रवाशांना हवे तेथे थांबे घेत खासगी वाहनांनी ‘मायेचा बाजार’ मांडला आहे. अशावेळी एस. टी. चालकाची तक्रार करत न बसता प्रवासी ते विसरूनही जातो़ यामुळे एस. टी. चालक आपल्याबाबत कोणीही तक्रार करत नसल्याच्या गैरसमजातून वारंवार चुका करतो़ अशावेळी आगारप्रमुखांनी चालकांना तशा सक्तीच्या सुचना वारंवार देण्याची आवश्यकता असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.गेल्या तीन वर्षात खेड बस स्थानकातील उभ्या असलेल्या एस. टी. बसमध्ये अर्धा शेकडा चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. पाकिटमार तसेच महिला प्रवाशांची पर्स चोरी आणि गळ्यातील मंगळसुत्रांच्या चोरीची घटना मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. या चोऱ्यांच्या प्रकरणातील एकाही आरोपीला आजवर शिक्षा झाली नाही. त्यामुळे एस. टी. प्रवास सुरक्षित आहे, ही भावना आता धुळीला मिळत आहे.महिला प्रवाशांना तसेच वयोवृध्दांनाही बसच्या प्रवासामध्ये सुरक्षितता वाटत नाही. मात्र, तरीही राज्य सरकारच्या बसमधून प्रवास केल्यास ते कमी खर्चाचे आणि सोयीचे असल्याने ते परवडणारे आहे. ही सर्वांचीच धारणा आहे़ अनेक एस. टी. चालकांच्या मनमानीपणामुळे प्रवाशांना जादा पैसे भरून खासगी वाहनांने प्रवास करावा लागत आहे. अशावेळी हेच एस. टी.चे प्रशासन वडापच्या नावावर खापर फोडत असते. अनेकवेळा महामंडळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एस. टी.च्या अशा चांगल्या योजनांचेही तीनतेरा वाजले आहेत.प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या आस्थेविषयी देखील शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात समन्वय निर्माण झाल्यास एस. टी.च्या बहुतांश योजना फलद्रूप झाल्याचे पहावयास मिळतील. याबरोबरच कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी आवश्यक तर सामंजस्यपूर्ण योजना तयार केल्यास आणि तिची नि:स्वार्थी अंमलबजावणी केल्यास एस. टी.चा तोटा काहीअंशी भरून निघण्यास मदत होणार आहे.नफ्यात येण्यासाठी प्रयत्नएस. टी. महामंडळ नेहमीच तोट्यात चालल्याची ओरड केली जाते. महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या. पण त्याचा फायदा किती झाला, हे अजूनही कळलेले नाही. कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील ताळमेळाच्या अभावामुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. जास्तीचे काम पडले की, कर्मचाऱ्यांची ओरड असतेच. त्यामुळे योजना यशस्वी होताना दिसत नाहीत.