शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Updated: December 25, 2015 00:39 IST

नगरपरिषदेची धडक कारवाई : प्रशासनातर्फे बाजारपेठेत सलग दोन दिवस कारवाई; व्यापारी धास्तावले

चिपळूण : येथील नगर परिषद प्रशासनातर्फे बुधवारीही बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही व्यावसायिकांनी पक्के बांधकाम केल्याने त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शहरातील शिवाजी चौक ते बाजारपेठ रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण वाढल्याने नगर परिषद प्रशासनाने या बांधकामाविरोधात मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचे व्यापाऱ्यांकडूनही स्वागत केले जात आहे. मुख्याधिकारी डॉ. विजय राठोड, बांधकाम अभियंता सुहास कांबळे, आरोग्य निरीक्षक अनंत हळदे, वैभव निवाते, वाहतूक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुहास वाकचौरे आदिंसह बांधकाम विभागातील कर्मचारी व सीआरएफचे पोलीस या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. बुधवारी सकाळपासून बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे काम सुरु करण्यात आले. ही अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम भेंडीनाक्यापर्यंत राबवली जाणार आहे. अर्बन बँकेजवळ असणारा कठडाही संबंधितांना तोडण्याची सूचना देण्यात आली आहे. बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांना दोन दिवसांच्या आत वाढीव बांधकामे काढून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांची बांधकामे तोडली जातील, असा इशारा देण्यात आला आहे. रस्त्याच्या काही अंतरावर असणाऱ्या पक्क्या दुकान मालकांना एक महिन्याची मुदत देण्यात येणार असून, या मुदतीत त्यांनी आवश्यक ते बांधकाम तोडले नाही तर प्रशासनातर्फे अशी बांधकामेही तोडली जाणार आहेत. चिपळूण बाजारपेठेत करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बांधकामे हटविण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जिल्हा प्रशानसनाने शहरातील कोंडी दूर करण्यासाठी मास्टर प्लॅन केले आहेत. त्यानुसार चिपळूण शहरातही कोंडी सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्या सूचनेनुसार नगरपरिषदेने ही कारवाई सुरू केली आहे. यामुळे शहरातील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना जरब बसणार आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. (वार्ताहर)मोहिमेचे शहरातून स्वागत : कारवाईत दुजाभाव असू नयेशहरातील बाजारपेठेत नगर परिषद प्रशासनातर्फे अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम राबविण्यात आली आहे, ही बाब अभिनंदनीय अशीच आहे. मात्र, ही कारवाई करताना दुजाभाव असू नये. दोन्ही बाजुचा विचार करुन ही कारवाई व्हायला हवी. भाजी मंडईचे मूल्यांकन होऊनही ती अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे व्यावसायिकांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली आहे. या कारवाईमुळे काही छोटे मोठे व्यावसायिकांवर बेघर होण्याची वेळही आली आहे, असे मत माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दुकानदारांना एक महिन्याची मुदतनगर परिषद प्रशासनाने अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम सुरु केली आहे. याचे व्यापाऱ्यांसह सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. काही व्यापाऱ्यांना यापूर्वीच्या प्रशासनाने दुकानांसाठी परवानगी दिली आहे. मात्र, जी कामे सध्या रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरत आहेत, अशा दुकानदारांना एक महिन्याची मुदत देऊन त्यांनी वाढविलेले बांधकाम स्वखर्चाने काढून घेण्याची सूचना करण्यात आली असून, ती काढण्यात आली नाही तर पुन्हा अशी बांधकामे तोडली जाणार असल्याचे बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांनी सांगितले.