शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पाणीटंचाईची झळ, रत्नागिरी जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर धावला; खेडमध्ये काहींचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:20 IST

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्राेत आटू लागले असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पाेहाेचू लागली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साेमेश्वर गावात ...

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्राेत आटू लागले असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पाेहाेचू लागली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साेमेश्वर गावात पाणीटंचाई तीव्र झाली असून, यावर्षीचा जिल्ह्यातील पहिला पाण्याचा टँकर तिथे धावला आहे. त्याचबराेबर चिपळूण, खेड, संगमेश्वर तालुक्यांतील काही गावांमधून पाण्यासाठी टँकरची मागणी सुरू झाली आहे.यावर्षी मोसमी पाऊस लांबल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी टिकून हाेती. परिणामी जिल्ह्यात पाणीपुरवठा करणारे टँकर उशिराने धावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एकही टँकर धावलेला नाही. फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीपातळी वेगाने खालावू लागली असून, ग्रामीण भागामध्ये तसेच डोंगराळ भागातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट दिसू लागले आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावातील चार वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दिवसाला एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर काही ग्रामस्थ खासगी टँकरनेही पाणी विकत घेत आहेत. गतवर्षी एप्रिल महिन्यात टँकर सुरू झाला होता. यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला आहे.

खेडमध्ये काहींचे स्थलांतरखेड तालुक्यातील काही लोकांनी पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे स्थलांतर केल्याचेही पुढे आले आहे. दरवर्षी खेड तालुक्यात पहिला टँकर धावतो. मात्र, यंदा त्याची सुरुवात रत्नागिरी तालुक्यातून झाली आहे. तसेच जिल्ह्यात आणखी काही तालुक्यांतून टँकरची मागणी करण्यात आलेली आहे.

भाजीपाल्यावर परिणामगेल्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत घट झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या पिकावर झाला आहे. भाज्यांचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेतील भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

बंधाऱ्याचे उद्दिष्ट निम्मेही नाहीयावर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिशन बंधारे हे अभियान राबविण्यात आले आहे. यामध्ये श्रमदानातून विविध बंधारे उभारण्यात आलेले आहेत. मात्र, यंदा बंधाऱ्याचे उद्दिष्ट निम्मेही पूर्ण झालेले नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ