शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
3
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
4
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
5
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!
6
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
7
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
8
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
9
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
10
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
11
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
12
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
13
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
14
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
15
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
16
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
17
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
18
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
19
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
20
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड

पाणीटंचाईची झळ, रत्नागिरी जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर धावला; खेडमध्ये काहींचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:20 IST

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्राेत आटू लागले असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पाेहाेचू लागली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साेमेश्वर गावात ...

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्राेत आटू लागले असून, जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पाेहाेचू लागली आहे. रत्नागिरी तालुक्यातील साेमेश्वर गावात पाणीटंचाई तीव्र झाली असून, यावर्षीचा जिल्ह्यातील पहिला पाण्याचा टँकर तिथे धावला आहे. त्याचबराेबर चिपळूण, खेड, संगमेश्वर तालुक्यांतील काही गावांमधून पाण्यासाठी टँकरची मागणी सुरू झाली आहे.यावर्षी मोसमी पाऊस लांबल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी टिकून हाेती. परिणामी जिल्ह्यात पाणीपुरवठा करणारे टँकर उशिराने धावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एकही टँकर धावलेला नाही. फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीपातळी वेगाने खालावू लागली असून, ग्रामीण भागामध्ये तसेच डोंगराळ भागातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट दिसू लागले आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावातील चार वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दिवसाला एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर काही ग्रामस्थ खासगी टँकरनेही पाणी विकत घेत आहेत. गतवर्षी एप्रिल महिन्यात टँकर सुरू झाला होता. यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला आहे.

खेडमध्ये काहींचे स्थलांतरखेड तालुक्यातील काही लोकांनी पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे स्थलांतर केल्याचेही पुढे आले आहे. दरवर्षी खेड तालुक्यात पहिला टँकर धावतो. मात्र, यंदा त्याची सुरुवात रत्नागिरी तालुक्यातून झाली आहे. तसेच जिल्ह्यात आणखी काही तालुक्यांतून टँकरची मागणी करण्यात आलेली आहे.

भाजीपाल्यावर परिणामगेल्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत घट झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या पिकावर झाला आहे. भाज्यांचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेतील भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

बंधाऱ्याचे उद्दिष्ट निम्मेही नाहीयावर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिशन बंधारे हे अभियान राबविण्यात आले आहे. यामध्ये श्रमदानातून विविध बंधारे उभारण्यात आलेले आहेत. मात्र, यंदा बंधाऱ्याचे उद्दिष्ट निम्मेही पूर्ण झालेले नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ