शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

थंडीअभावी अजूनही पालवीचे प्रमाण सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:21 IST

Mango, Winter Session Maharashtra, ratnagirinews डिसेंबर सुरू झाला तरी अद्याप थंडी गायब आहे. शिवाय मतलई वारही वाहात नसल्याने थंडीसाठी पोषक वातावरण नाही. जिल्ह्यात ९५ टक्के झाडांना पालवी आली आहे. मात्र, समुद्र किनारपट्टीलगत काही झाडांना दोन ते पाच टक्के मोहोर सुरू झाला आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर मोठ्या प्रमाणावर तुडतुडा असल्याने तो नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.

ठळक मुद्देथंडीअभावी अजूनही पालवीचे प्रमाण सर्वाधिक

रत्नागिरी : डिसेंबर सुरू झाला तरी अद्याप थंडी गायब आहे. शिवाय मतलई वारही वाहात नसल्याने थंडीसाठी पोषक वातावरण नाही. जिल्ह्यात ९५ टक्के झाडांना पालवी आली आहे. मात्र, समुद्र किनारपट्टीलगत काही झाडांना दोन ते पाच टक्के मोहोर सुरू झाला आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर मोठ्या प्रमाणावर तुडतुडा असल्याने तो नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.अद्यापही ऑक्टोबर हिटप्रमाणे उष्मा जाणवत असून पाहिजे त्या प्रमाणात थंडी सुरू झालेली नाही. सर्वत्र पालवीचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होण्यास सव्वा ते दीड महिन्याचा अवधी लागत असल्याने मोहोर प्रक्रियेस उशीर होण्याची शक्यता आहे.

पालवीवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव असल्याने कीटकनाशकांची फवारणीही वेळोवेळी करावी लागत आहे. काही ठिकाणी झाडांना किरकोळ मोहोर आला असून, तो जपण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागत आहे. अद्याप ३० ते ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. आंब्याला मोहोर येण्यासाठी २६ ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता आहे.जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये थंडीचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळे नीचांकी तापमानात येणाऱ्या मोहोराला फळधारणा अत्यल्प होते, त्याचवेळी पुनर्मोहोराचा धोका असल्याने एकूणच लहरी हवामानामुळे शेतकरी आतापासूनच धास्तावले आहेत.

पालवी सर्वाधिक असल्याने आंबा हंगाम लांबणार आहे, यात शंका नाही. मात्र, गतवर्षी फळधारणा न झालेल्या झाडांना मोहोर आला असून, त्याचे प्रमाण २ ते ५ टक्के इतकेच आहे. पालवीवर तुडतुडा मोठ्या प्रमाणावर असल्याने पालवीबरोबर मोहोर जपणे गरजेचे आहे.- राजन कदम, बागायतदार

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन