शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

धरण भूखंड वाटपाची चर्चा निष्फळ

By admin | Updated: March 23, 2015 00:34 IST

पोयनारचा प्रश्न : २२९ घरे विस्थापित होणार, १५ दिवसांनंतर पुन्हा बैठकीचे आयोजन

खेड : तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पोयनार धरणाचे काम सध्या बंद करण्यात आले आहे. तांत्रिक त्रुटीमुळे हे काम बंंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ ३५ कोटी रूपये खर्चूून हे काम करण्यात येणार आहे़ मात्र, अद्याप पुनर्वसनाचे काम सुरू झाले नसल्याने विस्थापितांची अडचण झाली आहे. प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपासाठी गुरूवारी आलेले उपजिल्हाधिकारी राऊत ग्रामस्थांच्या असहकार्यामुळे माघारी गेले. त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली.आता ही बैठक १५ दिवसांनंतर घेण्यात येणार असून, यामध्ये उभय बाजूंनी तोडगा काढणे शक्य होणार असल्याची माहिती धरण प्रकल्पाचे अधिकारी खेडेकर यांनी दिली आहे.पोयनार धरणासाठी राज्य सरकारने ३५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. यातील केवळ ४० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित काम निधीअभावी अनेकवेळा बंद करण्यात आले होते़ आता हे काम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम मंदावले होेते. आता अडचणी दूर झाल्या आहेत.़ यामुळे ठेकेदार कंपनी येत्या १५ दिवसात काम सुरू करणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. या धरणामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. परिसरातील शेतकरी आपल्या जमिनीतून चांगले पीक घेऊ शकणार आहेत. सिंचनाच्या दृष्टीने सरकारने आता शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्याने याच धरणातील पाण्यामुळे अनेक प्रकारची पिके शेतकऱ्यांना काढणे शक्य होणार आहे. धरणामुळे पोयनार गावातील ९० घरे, फुरूस गावातील १०६ घरे आणि धामणी गावातील ३३ घरे विस्थापित होणार आहेत़ २२९ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे.़ या सर्वांना भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. याकरिता रत्नागिरी येथून कूळवहीवाट विभागाचे उपजिल्हाअधिकारी राऊत आणि इतर अधिकारी यांनी गुरूवारी पोयनार गावाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार कारवाई सुरू केली असता ग्रामस्थांनी त्यास विरोध केला़ आम्हाला हवे त्या प्रमाणात भूखंडाची मागणी ते करीत होते. यास अधिकाऱ्यांनी मात्र विरोध केला. तसे होणार नाही, असे सांगत सरकारी नियमानुसार या भूखंडाचे वाटप होणार असल्याची माहिती विस्थापितांना दिली़ मात्र, तासभर झालेल्या चर्चेअंती उभयतांमध्ये तोडगा न निघाल्याने ही बैठक गुंडाळावी लागली. अखेर १५ दिवसांनंतर पुन्हा बैैठक घेण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत या धरणाचे काम पूर्ण करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या धरणामुळे अनेकांची तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीची कामे या धरणातील पाण्यावर होणार आहेत. यामुळे दुबार पिके काढणे शक्य होणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. खेड तालुक्यातील पोयनार धरणाखाली गेलेल्या गावांमधील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने नाराजी आहे. अशा प्रकल्पांचा सिंचनासाठी किती उपयोग होतो, हा प्रश्न वेगळा असला तरी छोट्या धरणांमधून येणारे पाणी व त्यातून येणारे उत्पन्न, सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी किती होतो, हे पाहाणेही महत्त्वाचे ठरेल. (प्रतिनिधी)राज्य सरकारकडून 35 कोटी मंजूरखेड तालुक्यातील लघुपाटबंधारे योजनेंतर्गत गाजलेला प्रश्न.पंधरा दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीकडे लक्ष.पोयनार धरणामुळे २२९ घरांचा प्रश्न ऐरणीवर.धरणे उभारण्यापूर्वी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा.आधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प या भूमिकेचे होतेय उल्लंघन. यापूर्वीच्या चर्चेतून तोडगा न निघाल्याने पुन्हा बैठक.शेतकऱ्यांना पीक घेणे शक्य, मात्र नवे धोरण राबवा.