शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलच्या कोट्यात झपाट्याने घट

By admin | Updated: January 20, 2015 23:34 IST

बुरे दिन : दोन लीटरऐवजी आता प्रत्येक माणसाला मिळणार फक्त दोनशे मिलीलीटर

रत्नागिरी : पूर्वी माणसी २ लीटर रॉकेलचे होत असलेले वाटप कमी करून आता केवळ २०० मिलीलीटर इतकेच केले जाणार असल्याने शासनाच्या या धोरणाबाबत ‘अच्छे दिन’ची स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांवर ‘हेच का ते अच्छे दिन’ म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये रॉकेल कपात करण्यात आली आहे. तेल, साखर, कडधान्यांपाठोपाठ आता रॉकेलही रेशनकार्डवरून गायब होते की काय, अशी शंका सामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात श्वेत शिधापत्रिकाधारक वगळून ३ लाख ७५ हजार ८५४ नागरिकांना रॉकेल वितरीत केले जाते. डिसेंबर २०१४पर्यंत शहरी भागात महिन्याला प्रतिमाणसी २ लीटर आणि प्रतिशिधापत्रिका जास्तीत २० लीटर रॉकेल, तर ग्रामीण भागात महिन्याला प्रतिमाणसी २ लीटर आणि प्रतिशिधापत्रिका जास्तीत १५ लीटर रॉकेल वितरीत करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. प्रत्यक्षात जिल्ह्याची रॉकेलची एकूण मागणी २८३० किलोलीटर इतकी होती. मात्र, या मागणीच्या ३७ टक्केच म्हणजे १०६८ किलोलीटर इतकेच रॉकेल जिल्ह्यासाठी पाठविले जात होते.त्यातच आता जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यासाठी केवळ ६४८ किलोलीटर (२३ टक्के) इतकाच रॉकेल कोटा मंजूर झाला आहे. त्यामुळे तालुक्यांना याचे कसे वितरण करायचे, असा पेच पुरवठा विभागासमोर निर्माण झाला आहे. जानेवारीचा रॉकेलचा कोटा उशिरा आल्याने पुरवठा विभागाने डिसेंबरच्या कोट्यातील ६० टक्के रॉकेलचे वितरण आधीच केले आहे. त्यामुळे आता जानेवारी महिन्यातील रॉकेलचे वितरण करताना दुकानदारांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अधिक माहिती घेता, केंद्र सरकारकडून आलेल्या धान्याच्या कोट्यामधून राज्यातील धान्याचा कोटा मंत्रालयातून मंजूर होतो. रॉकेलच्या कपातीबाबत मंत्रालयात चौकशी केली असता केंद्राकडूनच कमी रॉकेल साठा पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश रास्त दर धान्य दुकानदारांनी प्रति माणसी २०० मिलीमीटरप्रमाणे रॉकेलचे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील दुकानदारांनी सोमवारी येथील तहसीलदार मारूती कांबळे यांची भेट घेऊन आम्ही रॉकेलचे वाटप जनतेला कसे करायचे, याविषयी मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. यातून काहीतरी मार्ग काढू, असे कांबळे यांनी या दुकानदारांना सांगितले आहे. जिल्ह्यात रॉकेलचे १३ घाऊक विक्रेते आहेत. मात्र, आता पुरवठा विभागाबरोबर सर्वच दुकानदारांसमोर रॉकेलच्या वाटपाचा घोळ निर्माण झाला आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील जनता रॉकेलवर अवलंबून असते. मात्र, आता महिन्याला केवळ २०० मिलिलीटरवर गुजराण कशी करणार, एवढेसे रॉकेल दिव्याला तरी पुरेल का, असा सवाल ग्रामीण जनता करीत आहे. या भागातील जनतेला रॉकेल मिळेल काय, असा प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी)रॉकेल कपातीचा संबंधिताना फटका बसणार नव्या सरकारच्या घोषणेनुसार सामान्य माणसाला ‘अच्छे दिन’ येतील, असे वाटले होते. परंतु ही ‘बुरे दिन’ ची लक्षणे दिसतात. पामतेल, डाळी, साखर आदी कार्डवरून गायब झालेच आहे. आता काही दिवसांनी रॉकेलही गायब होणार की काय, असा सवालही सामान्य जनतेमधून विचारला जात आहे.शासनाने प्रतिव्यक्ती केवळ २०० मिलिलीटर रॉकेल देण्याची घोषणा केली आहे. सध्या रॉकेलचा लीटरचा दर १६ रूपये २५ पैसे इतका आहे. म्हणजे आता दुकानदाराला २०० मिलिलीटर इतक्या रॉकेलसाठी ३.२५ रूपयाची पावती देण्यासाठी एक रूपया खर्च करावा लागणार आहे. आधीच दुकानदारांना कमी मार्जिन आहे. त्यातच आता रॉकेल कपातीचा फटकाही बसणार आहे.- नितीन कांबळे, रास्तदर धान्य दुकानदार, नाणीज.तालुकाशिधापत्रिकाकि.ली.मंडणगड१८७५३१३८ दापोली४२७८७२५८ खेड४४९५८२३४गुहागर३३७१५२६२चिपळूण ३८६४१४४४संगमेश्वर५०७५३४२२ रत्नागिरी८२६८८४९८लांजा२८१५८२३३राजापूर४५४०१३४३एकूण३,७५,८५४२८३०