शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर हत्येप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST

रत्नागिरी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडण्यात गेली आठ वर्षे सरकारला अपयश येत आहे. याबाबत शासनाला आठवण ...

रत्नागिरी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडण्यात गेली आठ वर्षे सरकारला अपयश येत आहे. याबाबत शासनाला आठवण करून देत या हत्येकरींना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. डाॅ. पाटील यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत यावेळी सकारात्मक चर्चा केली.

२० ऑगस्ट २०२१ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खुनाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ साली वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंद्रे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे, अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींविरूद्धदेखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खुनाचा तपास वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. तरीही या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गोरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत.

सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रानुसार खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गाैरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आलेला आहे व त्यातून ही फक्त खुनाची घटना नसून हे दहशतवादी कृत्य असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना Unlawful Activities Prevention Act 1967 हा कायदा लावण्यात आला आहे. असं असतानाही अद्याप डाॅ. दाभाेलकर यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागला नसल्याबद्दल या निवेदनात खंत व्यक्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही, त्यामुळे या खुनामागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी, अशा मागणीचे निवेदन शासनाकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी विनोद वायंगणकर, मधुसूदन तावडे, राजेश कांबळे, राधा वणजू, वल्लभ वणजू आदी कार्यकर्ते उपस्थित होते.