शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजू बागायतदारांना नुकसानभरपाई द्या : विजय कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

खेड : ताैत्के वादळामुळे खेड तालुक्यातील शेतकरी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत द्या, शासनाने तत्काळ ...

खेड : ताैत्के वादळामुळे खेड तालुक्यातील शेतकरी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत द्या, शासनाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी खेडचे माजी सभापती विजय कदम यांनी केली.

मुख्यमंत्री तसेच कृषी व फलोत्पादन मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळापूर्वी आलेल्या वादळाने खेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची घरे, गोठे जमीनदोस्त झालेली आहेत. त्याचे पंचनामे होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन ही त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. ते मदतीपासून वंचित आहेत. तहसीलदार कार्यालयात वारंवार फेऱ्या मारूनही त्यांची कुणी दखल घेत नाही. अशा शेतकऱ्यांनाही त्यांची नुकसानभरपाई विनाविलंब मिळणे गरजेची आहे. कोकणातील शेतकरी अडचणीत आहे.

गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळात बागायती उद्‌ध्वस्त झाल्या. यावर्षी तयार झालेले आंब्याचे पीक हातातून गेल्याने शेतकरी हताश झालेला आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी विजय कदम यांनी केली आहे.