शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या हवामानाचाही अभ्यास, देशातील सहा शहरांमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:25 IST

Temperature, ratnagirinews जागतिक बँक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या जलविज्ञान हवामान कृती योजनेत देशातील ६ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत हवामानाचा अभ्यास होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या हवामानाचाही अभ्यास, देशातील सहा शहरांमध्ये समावेशजलविज्ञान हवामान कृती योजनेत रत्नागिरीची निवड

रत्नागिरी : जागतिक बँक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या जलविज्ञान हवामान कृती योजनेत देशातील ६ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत हवामानाचा अभ्यास होणार आहे.राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील हर्णै, दाभोळ येथे चक्रीवादळ निवाराशेड उभारण्याचे काम सुरु आहे. रत्नागिरी शहरासह ६ ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये चक्रीवादळापासून कमी नुकसान व्हावे यासाठी भुयारी वीजवाहिन्या टाकण्याचे कामही वेगाने सुरु झाले आहे. तर पावसाळयात वीज पडून माणसे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील ९५२ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा ७ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. भूकंप आपत्ती धोके अहवालात देशातील ५० निवडक शहरांमध्ये रत्नागिरीचा समावेश असून, त्यादृष्टीने कामे सुरु झाली आहेत.या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरे अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर तज्ज्ञ अभ्यास करणार असून, हा अहवाल जागतिक बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. एकूण १८ महिन्यांमध्ये हा अहवाल तयार करण्यात येणार असून, याची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

यावेळी हायड्रोलॉजिस्ट सुजाना धर आणि शहर समन्वयक हर्षद धांडे यांच्यासह जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते.महाराष्ट्रातील एकमेवया योजनेत देशातील ६ राज्यातील ६ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये गुजरातचे पोरबंदर, गोव्याचे पणजी, कर्नाटकचे मंगळुरु, केरळचे कोची, पश्चिम बंगालचे बिदानगर आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी या शहरांचा समावेश आहे.याचा होणार अभ्यासया योजनेत निवडलेल्या शहरांवर भविष्यात वाढती चक्रीवादळे, वाढते तापमान, बदलते ऋतुमान याचा शहर वाढ आणि विकासावर कोणता बदल होतो, यातून शहराला कोणते धोके आहेत, संकटे आल्यावर रहिवाशांना कोणता धोका तत्काळ पोहोचेल, कोणत्या प्रकारच्या सेवा इथे आहेत आणि कोणता समाज इथे राहतो, याचा अभ्यास या प्रकल्पातून केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या वादळांना तोड देणे शक्य होणार आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी