शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
4
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
5
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
6
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
7
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
8
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
9
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
10
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
11
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
12
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
13
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
14
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
15
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
16
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
17
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
18
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
19
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
20
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या हवामानाचाही अभ्यास, देशातील सहा शहरांमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:25 IST

Temperature, ratnagirinews जागतिक बँक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या जलविज्ञान हवामान कृती योजनेत देशातील ६ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत हवामानाचा अभ्यास होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या हवामानाचाही अभ्यास, देशातील सहा शहरांमध्ये समावेशजलविज्ञान हवामान कृती योजनेत रत्नागिरीची निवड

रत्नागिरी : जागतिक बँक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या जलविज्ञान हवामान कृती योजनेत देशातील ६ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत हवामानाचा अभ्यास होणार आहे.राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील हर्णै, दाभोळ येथे चक्रीवादळ निवाराशेड उभारण्याचे काम सुरु आहे. रत्नागिरी शहरासह ६ ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये चक्रीवादळापासून कमी नुकसान व्हावे यासाठी भुयारी वीजवाहिन्या टाकण्याचे कामही वेगाने सुरु झाले आहे. तर पावसाळयात वीज पडून माणसे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील ९५२ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा ७ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. भूकंप आपत्ती धोके अहवालात देशातील ५० निवडक शहरांमध्ये रत्नागिरीचा समावेश असून, त्यादृष्टीने कामे सुरु झाली आहेत.या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरे अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर तज्ज्ञ अभ्यास करणार असून, हा अहवाल जागतिक बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. एकूण १८ महिन्यांमध्ये हा अहवाल तयार करण्यात येणार असून, याची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

यावेळी हायड्रोलॉजिस्ट सुजाना धर आणि शहर समन्वयक हर्षद धांडे यांच्यासह जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते.महाराष्ट्रातील एकमेवया योजनेत देशातील ६ राज्यातील ६ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये गुजरातचे पोरबंदर, गोव्याचे पणजी, कर्नाटकचे मंगळुरु, केरळचे कोची, पश्चिम बंगालचे बिदानगर आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी या शहरांचा समावेश आहे.याचा होणार अभ्यासया योजनेत निवडलेल्या शहरांवर भविष्यात वाढती चक्रीवादळे, वाढते तापमान, बदलते ऋतुमान याचा शहर वाढ आणि विकासावर कोणता बदल होतो, यातून शहराला कोणते धोके आहेत, संकटे आल्यावर रहिवाशांना कोणता धोका तत्काळ पोहोचेल, कोणत्या प्रकारच्या सेवा इथे आहेत आणि कोणता समाज इथे राहतो, याचा अभ्यास या प्रकल्पातून केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या वादळांना तोड देणे शक्य होणार आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी