शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रत्नागिरीच्या हवामानाचाही अभ्यास, देशातील सहा शहरांमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:25 IST

Temperature, ratnagirinews जागतिक बँक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या जलविज्ञान हवामान कृती योजनेत देशातील ६ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत हवामानाचा अभ्यास होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या हवामानाचाही अभ्यास, देशातील सहा शहरांमध्ये समावेशजलविज्ञान हवामान कृती योजनेत रत्नागिरीची निवड

रत्नागिरी : जागतिक बँक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या जलविज्ञान हवामान कृती योजनेत देशातील ६ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहराचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत हवामानाचा अभ्यास होणार आहे.राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील हर्णै, दाभोळ येथे चक्रीवादळ निवाराशेड उभारण्याचे काम सुरु आहे. रत्नागिरी शहरासह ६ ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये चक्रीवादळापासून कमी नुकसान व्हावे यासाठी भुयारी वीजवाहिन्या टाकण्याचे कामही वेगाने सुरु झाले आहे. तर पावसाळयात वीज पडून माणसे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील ९५२ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा ७ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. भूकंप आपत्ती धोके अहवालात देशातील ५० निवडक शहरांमध्ये रत्नागिरीचा समावेश असून, त्यादृष्टीने कामे सुरु झाली आहेत.या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरे अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर तज्ज्ञ अभ्यास करणार असून, हा अहवाल जागतिक बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. एकूण १८ महिन्यांमध्ये हा अहवाल तयार करण्यात येणार असून, याची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

यावेळी हायड्रोलॉजिस्ट सुजाना धर आणि शहर समन्वयक हर्षद धांडे यांच्यासह जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते.महाराष्ट्रातील एकमेवया योजनेत देशातील ६ राज्यातील ६ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये गुजरातचे पोरबंदर, गोव्याचे पणजी, कर्नाटकचे मंगळुरु, केरळचे कोची, पश्चिम बंगालचे बिदानगर आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी या शहरांचा समावेश आहे.याचा होणार अभ्यासया योजनेत निवडलेल्या शहरांवर भविष्यात वाढती चक्रीवादळे, वाढते तापमान, बदलते ऋतुमान याचा शहर वाढ आणि विकासावर कोणता बदल होतो, यातून शहराला कोणते धोके आहेत, संकटे आल्यावर रहिवाशांना कोणता धोका तत्काळ पोहोचेल, कोणत्या प्रकारच्या सेवा इथे आहेत आणि कोणता समाज इथे राहतो, याचा अभ्यास या प्रकल्पातून केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या वादळांना तोड देणे शक्य होणार आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी