शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

कूळ जमिनींचे वर्गीकरण

By admin | Updated: April 7, 2015 01:12 IST

गुहागर तालुका : शासनाच्या तिजोरीत ४० पट महसूल

संकेत गोयथळे-गुहागर  तालुक्यात १८ हजार २२ वर्ग दोन कुळाच्या जमिनी आहेत. शासनाच्या नव्या आदेशानुसार महसूल खात्याने आवश्यक सर्व कागदांसह गावागावात शिबिर घेऊन या जमिनी कुळ असलेल्याना वर्ग एक करुन विक्री परवानगीयोग्य करायच्या आहेत. गुहागर तालुक्यात आतापर्यंत १ हजार ९५४ खातेदार नव्या कायद्यानुसार वर्ग एक झाले असून, शेतसाऱ्याच्या ४० पट ६१ हजार १४४ रुपये एवढी रक्कम भरणा करण्यात आली आहे.
ज्या व्यक्तींना कुळ कायद्यानुसार जमिनीचे मालक म्हणून दहा वर्षे किंवा त्यापूर्वी हक्क प्राप्त झाले आहेत. अशा व्यक्तींना शेतसाऱ्याच्या ४० पट एवढी रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केल्यास स्वतंत्र विक्री परवानगीची कोणतीही आवश्यकता नाही. ‘कसेल त्याची जमीन’ या तत्त्वानुसार एखाद्या व्यक्तीच्या शेतजमिनीस कूळ आहे किंवा नाही हे ठरविण्यात येते. त्यानंतर अशा जमिनी मूळ मालकाकडून कुळास खरेदी करता याव्यात म्हणून कूळ कायद्याच्या तरतुदीनुसार जमिनीची किंमत ठरविली जात होती. प्रचलीत बाजारभावाच्या तुलनेत ही किंमत अत्यंत नाममात्र असते. ती दिल्यावर सातबारा उताऱ्यावरील मूळ मालकाचे नाव कमी करुन कुळाचे नाव मालक म्हणून नोंदविले जात होते. ही कार्यपद्धती अवलंबून राज्यात लाखो कुळांना शेतजमिनीचे मालकी हक्क प्रदान करण्यात आले आहेत. पण, एखाद्या कुळास मालकी हक्काने शेतजमीन मिळाल्यानंतर त्याला अशी जमीन विकायची असल्यास महसूल अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत होती. मूळ कायदा हा राज्य घटनेच्या नवव्या परिशिष्टात समाविष्ट आहे, अशा कायद्यांना समाज कल्याणकारी कायदा म्हणून ओळखले जाते.
यापूर्वी होणाऱ्या विक्री परवानगीसाठी संबंधितांना मोठ्या प्रमाणात कागदपत्र जोडूनही सरकार दरबारी खेटे मारावे लागत होते. छुप्या आर्थिक व्यवहाराशिवाय ही कामे होत नसत. हे लक्षात घेऊन नव्याने कायदा बदलून महसूल खात्याने गावोगावी शिबिर घेऊन येथील अशा सर्व खातेदारांची यादी करुन या जमिनी वर्ग एक करुन विक्रीयोग्य करायच्या आहेत.
तालुक्यात असे ३० हून अधिक शिबिरे विविध गावातून झाली आहेत. मे २०१४ आधीपासून अशा प्रकारची शिबिरे घेण्याची सूचना वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आली होती. मात्र, २०१४ हे वर्ष लोकसभा व विधानसभा निवडणुकामध्ये गेल्याने ही मोहीम सुरु होण्यासाठीच काही महिने गेले. अशा पद्धतीने शिबिरे घेताना संबंधित लाभार्थी फार कमी संख्येने येतात. इतर आवश्यक कागदपत्र तलाठ्यामार्फत पूर्ण केली जातात. आजही ग्रामीण भागातून अनेक जमीनमालक शहराच्या ठिकाणी वास्तव्यास असतात.

शिबिरातून होतेय जनजागृती...
अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे सहजपणे जमीन कूळ काढून विक्री करता येऊ शकते, हेच माहीत नाही. गेले दोन महिने पुन्हा मार्चअखेर व कामकाज व्यस्ततेमुळे गुहागर तालुक्यात शिबिर झालेले नाही. त्यामुळे लोककल्याणकारी कायदा असूनही अनेक जमीनदार याचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले आहेत.