शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

जीवरक्षकांच्या वेतनाचा बोजा ग्रामपंचायतींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:16 IST

पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे आकर्षण अधिक असते. समुद्राच्या पाण्यात डुंबण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांचीही संख्या वाढत आहे. मात्र, पर्यटक बुडण्याच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले जीवरक्षकच आता असुरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषदेकडून त्यांचे वेतन बंद करण्यात आल्याने त्यांच्या वेतनाचा बोजा ग्रामपंचायतींवर पडला आहे. त्यामुळे आता जीवरक्षक ठेवण्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजीवरक्षकांच्या वेतनाचा बोजा ग्रामपंचायतींवरविमा संरक्षण नाहीच

रत्नागिरी : पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे आकर्षण अधिक असते. समुद्राच्या पाण्यात डुंबण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांचीही संख्या वाढत आहे. मात्र, पर्यटक बुडण्याच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले जीवरक्षकच आता असुरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषदेकडून त्यांचे वेतन बंद करण्यात आल्याने त्यांच्या वेतनाचा बोजा ग्रामपंचायतींवर पडला आहे. त्यामुळे आता जीवरक्षक ठेवण्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे हे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या इतर ठिकाणांपेक्षा अधिक आहे. पण तेथे पर्यटक बुडण्याच्या घटनादेखील अधिक आहेत. त्याचप्रमाणे गुहागर, दापोलीतील किनारेही प्रसिद्ध आहेत. रत्नागिरीतील आरे-वारे, भाट्ये हे समुद्रकिनारेही आता नावारूपाला आले आहेत. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्थानिकांकडून सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. अनेकदा पर्यटकांच्या गाड्याही समुद्राच्या वाळूत रूतल्या जातात.पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी किनाऱ्यांवर ह्यवॉच टॉवरह्ण उभारले असून, तिथे जीवरक्षकांचीही नियुक्ती केली आहे. गणपतीपुळे येथे ११ जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर दोन, गुहागर व दापोलीतही जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती झाल्यानंतर दोन ते तीन वर्षे जिल्हा परिषदेकडून या जीवरक्षकांना प्रत्येकी ६ हजार रुपये वेतन देण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेने हे वेतन देणे थांबविले आहे. उलट स्थानिक ग्रामपंचायतींशी पत्र व्यवहार करुन ग्रामपंचायतीमार्फत वेतन देण्यात यावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता या वेतनाचा भार ग्रामपंचायतींवर येऊन पडला आहे.विमा संरक्षण नाहीचभाट्ये ग्रामपंचायतीच्या दोन जीवरक्षकांना तर दि. १ मे २०१८ पासून ग्रामपंचायतच ६ हजार रुपये वेतन देत आहे. तर गणपतीपुळे येथील ११ जीवरक्षकांना फेब्रुवारी २०१९ पासून ग्रामपंचायतीने प्रत्येकी ६ हजार रुपये वेतन देणे सुरु केले आहे. मात्र, किनाऱ्यांवरील अन्य ग्रामपंचायतींना हे वेतन देणे अवघड बनले आहे. त्यातच जीवरक्षकांना विमा संरक्षण व अन्य काहीच गोष्टी दिल्या जात नाहीत. धोक्यात जीव घालून ते काम करत आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी