शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी सध्या जिल्ह्यासाठी येणारा साठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे आता ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी सध्या जिल्ह्यासाठी येणारा साठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे आता लसीकरणाच्या मोहिमेला खीळ बसली आहे. शासनाने आता सरसकट ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्याचे आदेश दिले असले तरी त्या तुलनेने लसीचा साठा अपुरा पडत असल्याने आता नागरिकांना लस अपुरी पडत आहे.

आरोग्य यंत्रणेची धावपळ

रत्नागिरी : जिल्ह्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून राबत असलेल्या आरोग्य यंत्रणेवर अधिकच ताण येत आहे. या यंत्रणेकडे मनुष्यबळही अपुरे आहे. त्यामुळे या रुग्णांना सेवा देताना यंत्रणेच्या नाकी नऊ आले आहे. कर्मचाऱ्यांना दोन दाेन पाळ्यांमध्येही अविरत सेवा द्यावी लागत आहे.

मोकाट श्वान वाढले

रत्नागिरी : जिल्हाभरात कोरोनाच्या अनुषंगाने लाॅकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहने दोन्हींची वर्दळ थांबली आहे. रात्री ८ वाजल्यानंतर तर रस्त्यावर सामसूम असते. मात्र, रस्त्यावर शुकशुकाट असला तरी मोकाट श्वान झुंडीने वावरत असतात. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांनी या श्वानांचा चांगलाच धसका घेतला आहे.

रस्ता दुरुस्तीचा त्रास

रत्नागिरी : शहरातील अनेक भागातील रस्ते सध्या खोदलेले आहेत. काही रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे चर खणून ठेवले आहेत. रात्रीच्या वेळी हे चर लक्षात येत नाहीत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अडचणीचे होत आहे. विशेषत: दुचाकीस्वारांना हे चर दिसत नसल्याने बरेचदा दुचाकी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

धामणी ग्रामपंचायतीचा उपक्रम

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीने गाव कोरोनामुक्त रहावे, यासाठी संपूर्ण गावाचे लसीकरण होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लसींबाबत गावातील लोकांचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता या लसीकरणाला ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. आतापर्यंत १४० ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे.

कामगारांमध्ये द्विधा अवस्था

चिपळूण : सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे यात काम करणाऱ्या कामगारांच्या हातचे काम थांबले आहेे. मध्यंतरी लाॅकडाऊन संपल्यानंतर हे कामगार पुन्हा परतले होते. मात्र, आता पुन्हा तीच परिस्थिती आल्याने आपल्या गावी परतावे की इथे रहावे, अशी त्यांची द्विधा अवस्था झाली आहे. काही कामगारांनी परतण्यास सुरुवात केली आहे.

हाॅटेल्सना फटका

दापोली : येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचबरोबर लाॅकडाऊन काळात घरपोच सेवा आणि पार्सलवगळता हाॅटेल्स, रेस्टाॅरंट यांनाही सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभर या व्यवसायाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यातच आता पुन्हा लाॅकडाऊन झाल्याने या व्यवसायाला माेठा आर्थिक फटका बसला आहे. खर्च कसा भागवायचा, ही चिंता सतावत आहे.

गाळ उपसा सुरू

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा नजीक असलेल्या देवडे गावातील काजळी नदी गाळ उपसा प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र १ किलोमीटर लांब, ८० मीटर रुंद, दोन मीटर खोल करण्यात आले आहे. हे काम नाम फाउण्डेशनने दिलेल्या पोकलॅण्ड यंत्राद्वारे सुरू करण्यात आले आहे.

कडक लाॅकडाऊन

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडअसुर्डे गावात १८ ते २६ एप्रिल या सात दिवसांच्या कालावधीत कडक लाॅकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा निर्णय घेतला आहे. आरोग्यसेवा आणि दवाखानेवगळता कुठलीही दुकाने सुरू ठेवण्यात आलेली नाहीत.

खेळही थांबले

गुहागर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सर्वत्र लाॅकडाऊन केले आहे. त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणेही बंद आहेत. त्यामुळे आता मोकळ्या मैदानांवर सुरू असलेल्या खेळांवरही मर्यादा आली आहे. त्यामुळे मोकळी मैदानेही सुनीसुनी झाली आहेत.