शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

भाजपने जिल्हा शिवसेनेला सोडला?,असंतोषाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 3:59 PM

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा भाजपने शिवसेनेलाच सोडला काय, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्दे गुहागरच्या जागेवर हक्क सांगणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीवर पाणीवादग्रस्त जागांमध्ये जिल्ह्यातील एकाही जागेचा समावेश नाही

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा भाजपने शिवसेनेलाच सोडला काय, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.शिवसेना व भाजपच्या युतीबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. सोमवारी भाजप उमेदवारांच्या अंतिम यादीसाठी नवी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी उशिरापर्यंत बैठक सुरू हाती. त्यावेळी केवळ चार जागांवरून अजूनही सेना व भाजपमध्ये तडजोड होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या चारही वादग्रस्त जागांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही जागेचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ भाजपने जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांवर उमेदवारी नको म्हणत तुळशीपत्र ठेवले असून, हा जिल्हाच सेनेला देऊन टाकल्याची चर्चा रंगली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली - खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी - संगमेश्वर, लांजा - राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांची काही वर्षांपूर्वीची युतीमधील वाटणी ही गुहागर, रत्नागिरी मतदारसंघ भाजपला व उर्वरित मतदारसंघ शिवसेनेला अशी होती. मात्र, आता ती स्थिती राहिलेली नाही. २०१४मध्ये राष्ट्रवादीतून सेनेत दाखल होऊन रत्नागिरी मतदारसंघात आमदार उदय सामंत स्थिरावले आहेत. त्यामुळे रत्नागिरीची जागा सेनेला सोडण्याची तयारी भाजपने ठेवलेलीच होती. परंतु गुहागरची जागा मात्र सोडणार नाही, अशी भाजपची प्रथमपासूनची ठाम भूमिका होती. भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड व अन्य नेत्यांनीही ही भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली होती.मात्र, शिवसेनेने जिल्ह्यातील पाचही जागांवर आपल्या उमेदवारांना ए. बी. फॉर्म दिल्यानंतरही भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजपला सेनेचा निर्णय मान्य आहे, असा अर्थ त्यातून काढला जात आहे. भाजपची मागणी असलेली जिल्ह्यातील गुहागरची जागाही सेनेला देण्यास भाजप नेतृत्त्वाने खरोखर मान्यता दिली आहे का, असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे. ह्यसबकुछ शिवसेनाह्ण हे सूत्र जिल्ह्यातील भाजपला मान्य होईल की वादंग सुरू होतील, याचीही चर्चा आहे.सबकुछ शिवसेना मुळे बंडखोरी होणार?जिल्ह्यात भाजप विधानसभेच्या एकाही जागेवर लढणार नाही, हे पाहता भाजप जिल्ह्यात अस्तित्वहीन होण्याची भीती जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तलवार म्यान करूनच राहायचे तर त्याचा पक्षाला काय फायदा, असा सवालही केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते सेनेला मनापासून मदत करतील का, गुहागरमध्ये बंडखोरीची शक्यता आहे का, या चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी