शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

रत्नागिरीत बेकायदेशीर वास्तव्य, बांगलादेशी महिलेला कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:43 IST

रत्नागिरी : व्हिसाचा कालावधी संपूनही रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या बांगलादेशी महिलेला ...

रत्नागिरी : व्हिसाचा कालावधी संपूनही रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या बांगलादेशी महिलेला न्यायालयाने सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या महिलेला १७ जानेवारी २०२०५ रोजी दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती.सलमा खातून बिलाल मुल्ला ऊर्फ सलमा राहिल भोंबल (३०, रा. सफा टॉवर्स बिल्डिंग, साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेविरोधात शहर पोलिस स्थानकात भारतीय न्यायसंहिता १९५० चा नियम ३ (ए), ६ (ए) विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६चे कलम १४ (अ) व कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी गोसावी यांनी आरोपी महिलेला ६ महिने साधा कारावास व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास १ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.या खटल्यात शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी काम पाहिले. तर पैरवी अंमलदार म्हणून महिला हवालदार साळवी व पाटील यांनी काम पाहिले.

९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात

  • सलमा ही १६ डिसेंबर २०१६ रोजी ९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. यावेळी तिचे वास्तव्य गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे होते. यानंतर तिने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला.
  • व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती २०१७ ते २०२५ या कालावधीत अवैधरीत्या भारतात राहत हाेती. या काळात सलमा तिने आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखला आदी बनावट कागदपत्रे तयार करीत भारतात वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBangladeshबांगलादेशWomenमहिलाCourtन्यायालयPoliceपोलिस