शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

तेव्हा आईकडे साखर वाटायलाही पैसे नव्हते, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी सांगितली आठवण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:30 IST

दहावीत तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला पाच हजाराचे बक्षीस जाहीर करणाऱ्या गवाणकर यांनी सांगितली आठवण 

राजापूर : परीक्षेत पास हाेणे त्याहीपेक्षा पहिलं येणे ही गाेष्ट मुलांसाठी महत्त्वाची असते. त्याचा आनंद वेगळाच असताे. मी जेव्हा सातवीच्या परीक्षेत पास झालो होतो, त्यावेळी साखर वाटायलाही माझ्या आईकडे पैसे नव्हते. तिने खाडीत जाऊन कालव बोचून ती विकून साखर आणली होती आणि वाटली होती, अशी आठवण ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी सांगितली.दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे नाटककार गंगाराम गवाणकर यांनी जाहीर केले आहे. याबाबत बाेलताना त्यांनी सांगितले की, तालुक्यात दोन विद्यार्थी प्रथम आल्याने त्यांना बक्षिसाची रक्कम विभागून न देता दाेघांना प्रत्येकी पाच-पाच हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शालांत परीक्षेचा हा जीवनातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी पहिला टप्पा असतो त्या परीक्षेमध्ये पास होणे आणि त्याहीपेक्षा प्रथम येणे म्हणजे मुलांसाठी महत्त्वाची गोष्ट असते. माझे स्वतःचे शिक्षण रात्रीच्या हायस्कूलमधून झाले आहे. शालांत परीक्षेच्या या टप्प्यावर पास होणे आणि त्याचा आनंद काय असतो याची आठवण आज ही मला येते, असे ते म्हणाले.मी सातवीच्या परीक्षेत पास झालो होतो. त्यावेळी आईने खाडीत जाऊन कालव बोचून तिने ती विकून साखर आणली होती आणि वाटली होती. बोर्डाच्या म्हणजे तत्कालीन अकरावीच्या परीक्षेत पास झालो होतो. तेव्हा आता ज्या  पद्धतीने आनंद साजरा केला जातो, तसा आमच्या नशिबात नव्हता. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे छोटसं बक्षीस देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अथर्व माेरे, आदिती वायबसे बक्षिसाचे मानकरीपाचल येथील सरस्वती विद्यामंदिरचा अथर्व मोरे व कारवली येथील अर्जुना माध्यमिक विद्यालयाची आदिती वायबसे यांनी ९८.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. हे दाेघे गंगाराम गवाणकर यांनी जाहीर केलेल्या बक्षिसाला पात्र ठरले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी