शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसूर्य: आशाताई पाथरे, गर्भार मैत्रीण स्वातंत्र्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपली

By शोभना कांबळे | Updated: August 9, 2022 16:44 IST

चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांनी विद्यार्थीदशेतच तुरुंगवास भोगला. तेव्हा महिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार पाहून या लढ्यातील सहभागाचा जोश अधिक तीव्र झाल्याने आशाताई सांगत.

चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांनी विद्यार्थीदशेतच तुरुंगवास भोगला. तेव्हा महिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार पाहून या लढ्यातील सहभागाचा जोश अधिक तीव्र झाल्याने आशाताई सांगत.स्वातंत्र्याच्या चळवळीत मोठ्यांबरोबरच अगदी किशोरवयीन मुलांनीही लढा दिला. १९४२ साली सुरू झालेल्या ‘चले जाव’ चळवळीने विद्यार्थ्यांमध्येसुद्धा स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती. या चळवळीत रत्नागिरीतील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश होता. स्वातंत्र्यासाठी विद्यार्थिदशेतील अनेक मुलांनी कारावास भाेगला. यात रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांचा समावेश होता. विद्यार्थिदशेतच त्यांनी या आंदोलनात सक्रिय उडी घेतली होती. आशाताईंचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. अगदी ९६च्या पुढील त्यांचे वय असूनही १९४२ च्या लढ्याच्या आठवणी जशाच्या तशा सांगताना त्या हरखून जात.आशाताई पाथरे त्यावेळी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये बी. ए. करत होत्या. ९ ऑगस्ट १९४२ला मुंबईला गवालिया टँकवर म्हणजे आताच्या आझाद हिंद मैदानावर महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ची घोषणा केली आणि ब्रिटिश सरकारने सर्व प्रमुख नेत्यांना गजाआड केले. त्यावेळी विद्यार्थिदशेतही देशभक्ती ओतप्रोत भरलेली असे. आशाताईंनी जाग्या केलेल्या त्यांच्या आठवणींपैकी ही एक आठवण. एके दिवशी देशप्रेमाने भारावलेले त्यांचे वर्गमित्र ‘मधू पोंक्षे’ त्यावेळच्या सांगली स्टेशनसमोरील चौकात उभे राहून ब्रिटिशांविरुद्ध भाषण करू लागले. त्यांचे सर्व मित्र-मैत्रिणी त्यांच्यासोबत होते. त्यात आशाताईंचाही समावेश होता.जमाव गोळा झालेला पाहताच ब्रिटिश सरकारचे शस्त्रास्त्रधारी घोडेस्वार या विद्यार्थ्यांवर चालून आले. मात्र, मधू पोंक्षे जराही न डगमगता आपले भाषण करत होते. ब्रिटिश पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी प्रखर लाठीहल्ला सुरू केला. मधू पोंक्षेंना मारू नये म्हणून या विद्यार्थ्यांनी त्यांच्याभोवती कडे केले होते. पण हे कडे तोडून त्याला बाहेर ओढून पोलीस अमानुषपणे दांडक्याने मारू लागले. मधू पोंक्षे पळतच स्टेशनकडे जात असताना एका दांडक्याचा फटका त्यांच्या डोक्यावर बसला. डोके फुटल्याने त्यातून रक्ताचा पाट वाहू लागला. ते स्टेशनच्या पायरीवरच बेशुद्ध पडले.येरवडा येथील कारागृहातही आशाताईंनी सक्तमजुरीचीही शिक्षा भोगली होती. त्यांच्या बरॅकमध्ये यावेळी सातारा येथील सुलोचना जोशी, कुसुम मोकाशी या त्यांच्या मैत्रिणीही होत्या. त्यांच्यासमवेत असणाऱ्या गुन्हेगार महिलांसोबत राहाण्याचे अनुभव आशाताई सांगताना अंगावर शहारे येत. नऊ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सुलोचना जोशी या त्यांच्या मैत्रिणीला ब्रिटिश सरकारने बर्फाच्या लादीवर झोपण्याची शिक्षा दिली.मात्र, देशप्रेमासाठी तिने तीही आनंदाने सोसली. आशाताईंचे पतीही आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभारलेल्या स्वातंत्र्य चळवळीत आपला खारीचा वाटा उचलायला मिळाला, हे आपले भाग्य असल्याचे त्या अभिमानाने सांगत. २७ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी त्या कालवश झाल्या आणि रत्नागिरीला स्वातंत्र्य चळवळीशी जोडणारा दुवा निखळला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीIndependence Dayस्वातंत्र्य दिन