शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसूर्य: आशाताई पाथरे, गर्भार मैत्रीण स्वातंत्र्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपली

By शोभना कांबळे | Updated: August 9, 2022 16:44 IST

चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांनी विद्यार्थीदशेतच तुरुंगवास भोगला. तेव्हा महिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार पाहून या लढ्यातील सहभागाचा जोश अधिक तीव्र झाल्याने आशाताई सांगत.

चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांनी विद्यार्थीदशेतच तुरुंगवास भोगला. तेव्हा महिलांवर पोलिसांनी केलेले अत्याचार पाहून या लढ्यातील सहभागाचा जोश अधिक तीव्र झाल्याने आशाताई सांगत.स्वातंत्र्याच्या चळवळीत मोठ्यांबरोबरच अगदी किशोरवयीन मुलांनीही लढा दिला. १९४२ साली सुरू झालेल्या ‘चले जाव’ चळवळीने विद्यार्थ्यांमध्येसुद्धा स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती. या चळवळीत रत्नागिरीतील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश होता. स्वातंत्र्यासाठी विद्यार्थिदशेतील अनेक मुलांनी कारावास भाेगला. यात रत्नागिरीतील आशाताई पाथरे यांचा समावेश होता. विद्यार्थिदशेतच त्यांनी या आंदोलनात सक्रिय उडी घेतली होती. आशाताईंचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. अगदी ९६च्या पुढील त्यांचे वय असूनही १९४२ च्या लढ्याच्या आठवणी जशाच्या तशा सांगताना त्या हरखून जात.आशाताई पाथरे त्यावेळी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये बी. ए. करत होत्या. ९ ऑगस्ट १९४२ला मुंबईला गवालिया टँकवर म्हणजे आताच्या आझाद हिंद मैदानावर महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ची घोषणा केली आणि ब्रिटिश सरकारने सर्व प्रमुख नेत्यांना गजाआड केले. त्यावेळी विद्यार्थिदशेतही देशभक्ती ओतप्रोत भरलेली असे. आशाताईंनी जाग्या केलेल्या त्यांच्या आठवणींपैकी ही एक आठवण. एके दिवशी देशप्रेमाने भारावलेले त्यांचे वर्गमित्र ‘मधू पोंक्षे’ त्यावेळच्या सांगली स्टेशनसमोरील चौकात उभे राहून ब्रिटिशांविरुद्ध भाषण करू लागले. त्यांचे सर्व मित्र-मैत्रिणी त्यांच्यासोबत होते. त्यात आशाताईंचाही समावेश होता.जमाव गोळा झालेला पाहताच ब्रिटिश सरकारचे शस्त्रास्त्रधारी घोडेस्वार या विद्यार्थ्यांवर चालून आले. मात्र, मधू पोंक्षे जराही न डगमगता आपले भाषण करत होते. ब्रिटिश पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी प्रखर लाठीहल्ला सुरू केला. मधू पोंक्षेंना मारू नये म्हणून या विद्यार्थ्यांनी त्यांच्याभोवती कडे केले होते. पण हे कडे तोडून त्याला बाहेर ओढून पोलीस अमानुषपणे दांडक्याने मारू लागले. मधू पोंक्षे पळतच स्टेशनकडे जात असताना एका दांडक्याचा फटका त्यांच्या डोक्यावर बसला. डोके फुटल्याने त्यातून रक्ताचा पाट वाहू लागला. ते स्टेशनच्या पायरीवरच बेशुद्ध पडले.येरवडा येथील कारागृहातही आशाताईंनी सक्तमजुरीचीही शिक्षा भोगली होती. त्यांच्या बरॅकमध्ये यावेळी सातारा येथील सुलोचना जोशी, कुसुम मोकाशी या त्यांच्या मैत्रिणीही होत्या. त्यांच्यासमवेत असणाऱ्या गुन्हेगार महिलांसोबत राहाण्याचे अनुभव आशाताई सांगताना अंगावर शहारे येत. नऊ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सुलोचना जोशी या त्यांच्या मैत्रिणीला ब्रिटिश सरकारने बर्फाच्या लादीवर झोपण्याची शिक्षा दिली.मात्र, देशप्रेमासाठी तिने तीही आनंदाने सोसली. आशाताईंचे पतीही आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभारलेल्या स्वातंत्र्य चळवळीत आपला खारीचा वाटा उचलायला मिळाला, हे आपले भाग्य असल्याचे त्या अभिमानाने सांगत. २७ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी त्या कालवश झाल्या आणि रत्नागिरीला स्वातंत्र्य चळवळीशी जोडणारा दुवा निखळला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीIndependence Dayस्वातंत्र्य दिन