शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

हंगाम सुरु होतानाच आंब्याला हवामानातील बदलाचा फटका, मोहर लांबणीवर

By मेहरून नाकाडे | Updated: November 17, 2022 17:58 IST

सध्याची पालवी जून होऊन मोहोर येण्यासाठी जानेवारीचा मध्य किंवा फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता

रत्नागिरी : हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळे बागायतदार हैराण झाले आहेत. या बदलांमुळे पिकाच्या विशेषत: आंब्याच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. सध्या ९० टक्के झाडांना पालवी आली आहे. त्यामुळे मोहर प्रक्रिया उशिराने होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दोन दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे तुडतुड्यांचा तसेच काही ठिकाणी थ्रीप्सचाही प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे पालवीवर कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे.पावसाचा मुक्काम यावर्षी दिवाळीपर्यंत होता. त्यामुळे ९० टक्के झाडांना पालवी आली असून, केवळ दहा टक्के झाडे मोहराकडे वर्ग होत आहेत. दिवसा ऊन व रात्री थंडी, पहाटेचे धुके हे हवामान आंबा पिकासाठी पोषक होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. हवामान खात्याने तर पावसाचा इशारा दिला होता. ढगाळ हवामानामुळे पालवीवर तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करून दोन्ही कीडरोग नियंत्रणास आणण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पालवी असलेल्या झाडांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.उत्पादनावर परिणामतुडतुडा नियंत्रणात न आणल्यास पालवीवर तुडतुड्याची विष्ठा साचून काळे डाग राहतात. त्यामुळे पानांद्वारे कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेणे व ऑक्सिजन बाहेर सोडणे या प्रक्रियेवर परिणाम होतो. पानांवर काळे डाग चिकटून राहिल्याने मोहोर तयार होण्याच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होते. शिवाय उत्पादनावरही परिणाम होतो. चांगले उत्पादन मिळण्यासाठी पालवीवरील तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.रोग थांबायला हवेतसध्याची पालवी जून होऊन मोहोर येण्यासाठी जानेवारीचा मध्य किंवा फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता आहे, तरच आंबा मार्चअखेर किंवा एप्रिलमध्ये बाजारात येऊ शकतो. फळप्रक्रिया सुरळीत व हमखास होण्यासाठी झाडांचे कीडरोगांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. तुडतुडा, थ्रीप्सपाठोपाठ काही ठिकाणी उंटअळीचा प्रादुर्भाव होण्याचीही भीती आहे. हवामानातील बदलाचा अंदाज घेत आंबा पिकासाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे.सुरुवात होतानाच थंडी गोठलीऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत असल्याने ऑक्टोबर हीट जाणवली नाही. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पाऊस पडल्याने पहिल्या टप्प्यातील मोहराचे नुकसान झाले होते. यावर्षी दिवाळीनंतर पाऊस पडला नाही. थंडीनेही चांगली सुरुवात केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून थंडी ओसरली असून, उकाडा वाढला आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. ढगाळ हवामान कीडरोगाला पोषक असल्याने बागायतदारांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे.

दिवाळीपासूनचे हवामान आंबा पिकासाठी पोषक होते. सर्वत्र पालवी आली असून, केवळ दहा टक्के झाडांना मोहर आहे. गेल्या दोन-चार दिवसांतील ढगाळ हवामानामुळे पालवीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. वेळीच कीटकनाशक फवारणी करून कीडरोग नियंत्रणात आणणे गरजेचे आहे, अन्यथा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. -  राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान