शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम सुरु होतानाच आंब्याला हवामानातील बदलाचा फटका, मोहर लांबणीवर

By मेहरून नाकाडे | Updated: November 17, 2022 17:58 IST

सध्याची पालवी जून होऊन मोहोर येण्यासाठी जानेवारीचा मध्य किंवा फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता

रत्नागिरी : हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळे बागायतदार हैराण झाले आहेत. या बदलांमुळे पिकाच्या विशेषत: आंब्याच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. सध्या ९० टक्के झाडांना पालवी आली आहे. त्यामुळे मोहर प्रक्रिया उशिराने होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दोन दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे तुडतुड्यांचा तसेच काही ठिकाणी थ्रीप्सचाही प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे पालवीवर कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे.पावसाचा मुक्काम यावर्षी दिवाळीपर्यंत होता. त्यामुळे ९० टक्के झाडांना पालवी आली असून, केवळ दहा टक्के झाडे मोहराकडे वर्ग होत आहेत. दिवसा ऊन व रात्री थंडी, पहाटेचे धुके हे हवामान आंबा पिकासाठी पोषक होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. हवामान खात्याने तर पावसाचा इशारा दिला होता. ढगाळ हवामानामुळे पालवीवर तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करून दोन्ही कीडरोग नियंत्रणास आणण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पालवी असलेल्या झाडांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.उत्पादनावर परिणामतुडतुडा नियंत्रणात न आणल्यास पालवीवर तुडतुड्याची विष्ठा साचून काळे डाग राहतात. त्यामुळे पानांद्वारे कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेणे व ऑक्सिजन बाहेर सोडणे या प्रक्रियेवर परिणाम होतो. पानांवर काळे डाग चिकटून राहिल्याने मोहोर तयार होण्याच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होते. शिवाय उत्पादनावरही परिणाम होतो. चांगले उत्पादन मिळण्यासाठी पालवीवरील तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.रोग थांबायला हवेतसध्याची पालवी जून होऊन मोहोर येण्यासाठी जानेवारीचा मध्य किंवा फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता आहे, तरच आंबा मार्चअखेर किंवा एप्रिलमध्ये बाजारात येऊ शकतो. फळप्रक्रिया सुरळीत व हमखास होण्यासाठी झाडांचे कीडरोगांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. तुडतुडा, थ्रीप्सपाठोपाठ काही ठिकाणी उंटअळीचा प्रादुर्भाव होण्याचीही भीती आहे. हवामानातील बदलाचा अंदाज घेत आंबा पिकासाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे.सुरुवात होतानाच थंडी गोठलीऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत असल्याने ऑक्टोबर हीट जाणवली नाही. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पाऊस पडल्याने पहिल्या टप्प्यातील मोहराचे नुकसान झाले होते. यावर्षी दिवाळीनंतर पाऊस पडला नाही. थंडीनेही चांगली सुरुवात केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून थंडी ओसरली असून, उकाडा वाढला आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. ढगाळ हवामान कीडरोगाला पोषक असल्याने बागायतदारांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे.

दिवाळीपासूनचे हवामान आंबा पिकासाठी पोषक होते. सर्वत्र पालवी आली असून, केवळ दहा टक्के झाडांना मोहर आहे. गेल्या दोन-चार दिवसांतील ढगाळ हवामानामुळे पालवीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. वेळीच कीटकनाशक फवारणी करून कीडरोग नियंत्रणात आणणे गरजेचे आहे, अन्यथा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. -  राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान