शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल, मे महिन्यात सामान्य तापमानापेक्षा राहणार अधिक तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

रत्नागिरी : मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात वातावरणात बदल दिसत आहे. गेल्या काही ...

रत्नागिरी : मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात वातावरणात बदल दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान कमी झाले असून मंगळवारपासून मळभाचे आच्छादन दिसू लागले आहे. एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने अधिक तापमानाचे मानले जातात. मात्र, यावर्षी या कालावधीतील तापमानापेक्षा साधारणत: एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढलेले राहील, असा अंदाज दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान सल्ला केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल घडून येत आहेत. गेल्या आठवड्यात कमालीची उष्णता वाढली होती. मात्र, आता पुन्हा सामान्य वातावरण आहे. मंगळवारपासून जिल्ह्यात मळभाचे वातावरण निर्माण झाले असून कधीही पाऊस पडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत माहिती देताना डाॅ. मोरे म्हणाले की, मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकण, तामिळनाडू, कर्नाटक आदी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात जाणवत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वाढलेले तापमान काहीअंशी कमी झाले आहे.

भारत मोसम विज्ञान विभागाकडून (आय. एम. डी.) या हवामान केंद्राकडे प्रत्येक पाच दिवसांनी हवामानाचा अंदाज पाठविला जातो. त्यानुसार दोन आठवड्यांपूर्वी तापमानात वाढ झाली होती आणि आर्द्रता कमी झाली होती. मात्र, आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता तापमान खाली आले आहे. मात्र, या एप्रिल, मे महिन्यात नेहमीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने तापमान वाढलेले रहाणार आहे. आय. एम. डी. कडून आलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने ७ ते ११ एप्रिल या कालावधीत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. त्यानंतर मात्र, नेहमीपेक्षा कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आय.एम. डी. कडून व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत नेहमीपेक्षा १ ते २ अंश सेल्सिअसने तापमान वाढणार असल्याचे या केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

कोट..........

यावर्षी तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ राहणार आहे. एप्रिल आणि मे हे दोन महिने सर्वाधिक तापमानाचे मानले जातात. या महिन्यात १ ते २ अंश सेल्सिअसने तापमान वाढलेले राहणार आहे.

डाॅ. विजय मोरे, नोडल अधिकारी, कृषी विद्या विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली