शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

रत्नागिरीत आॅलिव्ह रिडले'च्या पिल्लांना जीवदान, अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 2:57 PM

वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले.

ठळक मुद्देकासवमित्र, वन खात्याच्या माध्यमातून अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू

रत्नागिरी : वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले.नोव्हेंबर ते फेबु्वारी या कालावधीत अनेक कासवे रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर अंधारात अंडी घालण्यासाठी येत असतात. कासवमित्र व वन खात्याच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी गस्त घालून, कासवाने घातलेली अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू झाले.

ही अंडी पुढील ५० दिवस समुद्रकिनारी नेटने बांधलेल्या जाळ्यांमध्ये खड्डा काढून ठेवल्यानंतर जन्माला येणाऱ्या पिल्लांना समुद्रात सोडून देण्यात येते. विभागीय वन अधिकारी विकास जगताप, प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील, सुधीर रिसबूड यांच्या मार्गदर्शनाखाली पिल्लांना समुद्रकिनाऱ्यांवर सोडण्यात आले.५० ते ५५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतातकासव समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालून ती वाळूने झाकून निघून जाते. त्यानंतर खुणांवरून अंड्यांचा शोध घेतला जातो. ही अंडी समुद्रकिनारी तयार केलेल्या उबवणीगृहात ठेवली जातात. साधारण ५० ते ५५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. त्यांना समुद्रकिनारी २० ते २५ फुटांवर सोडण्यात येते.

त्यानंतर ही पिल्ले पाण्यात झेपावतात. मच्छीमारी, समुद्री जीव व अन्य श्वापदे या सगळ्यातून कासव जगण्याचे प्रमाण अत्यल्प असते. त्यासाठी त्यांचे संवर्धन आवश्यक असल्याचे विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीenvironmentवातावरण