शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३० वर्षांनंतर निवधेतील ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

देवरुख / सचिन मोहिते : संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावाला जोडणाऱ्या बावनदी साकवावरून धोकादायक परिस्थितीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची ...

देवरुख / सचिन मोहिते : संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावाला जोडणाऱ्या बावनदी साकवावरून धोकादायक परिस्थितीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आजपर्यंत येथील अबालवृद्धांवर होती. हे विदारक चित्र प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ही समस्याच कायमची दूर करण्याचा शब्द आमदार शेखर निकम यांनी तेथील ग्रामस्थांना निवडणुकीपूर्वी दिला होता. त्यांनी निवधे पुलाचा प्रश्नच मार्गी लावत या पुलाकरिता तब्बल ४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर केले आहेत. या पुलामुळे सुमारे ३० वर्षे या लोखंडी साकवावरून करावा लागणारा जीवघेणा प्रवास थांबणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील निवधे गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे १८००च्या घरात आहे. या गावाला जोडणाऱ्या बावनदीवर लोखंडी साकव आहे. मात्र, याची अवस्था अतिशय धोकादायक झाली आहे. निवधे गावातून बामणोली, ओझरे, मारळ, मार्लेश्वर, आंगवली, देवरुख या ठिकाणी जाण्यासाठी रहदारी सुरू असते. गावातील लोक व मार्लेश्वरकरिता चालत येणारे भाविक या पुलाचा वापर करतात.

हा लोखंडी साकव जुना असून, तो अतिशय धोकादायक बनला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पूल व्हावा, अशी ग्रामस्थ अनेक वर्षे मागणी करत होते. पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पावसाळ्यात बावनदीला मोठे पाणी आल्यानंतर पाणी या लोखंडी पुलाला लागत असते. बावनदीवरील लोखंडी साकवाचे काही भाग गंजल्याने सडले आहेत. त्यामुळे मोठ्या पुरात हा साकव वाहून जाण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत होती.

याठिकाणी पूल उभारावा, अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी हाेती. मात्र, त्याकडे आजवर दुर्लक्षच करण्यात आले. मात्र, निवडणुकीपूर्वी मतदार संघात फिरताना ही समस्या आमदार शेखर निकम यांनी पाहिली. त्याचवेळी त्यांनी तेथील ग्रामस्थांना पुलाचा विषय मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आमदार निकम यांनी सीआरआयएफमधून बामणोली ते निवधे पुलासाठी तब्बल ४ कोटी ३२ लाख रुपये एवढा निधी मंजूर केला आहे.