शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीची लगबग, रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत किती हेक्टर क्षेत्रावर झाली पेरणी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:33 IST

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी ...

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी करणे अशक्य व धोकादायक होते. त्यामुळे पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामाला प्रारंभ केला. जिल्ह्याचे मुख्य पीक भात, तर दुय्यम पीक नागली असून, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रोपे काढून लागवड पद्धत अवलंबली जाते. जिल्ह्यात एकूण ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, आतापर्यंत एकूण २,५४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.मृग नक्षत्र सुरू झाले असून, सलग पाऊस नसला तरी बऱ्यापैकी उघडझाप सुरू आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा पाहून शेतकरी भात, नाचणीची पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, तर १० हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली जाते; मात्र तत्पूर्वी लागवडीसाठी रोपे काढण्यासाठी पेरणी केली जाते.सध्या जिल्ह्यात पेरणीची कामे सुरू आहेत. पारंपरिक नांगर; तसेच पाॅवर टिलरच्या साहाय्याने नांगरणी केली जात आहे; मात्र पाणथळ जमिनीत नांगरणी न करता कुदळीचा वापर करून खणून पेरणी करण्यात येत आहे. पेरणीनंतर २० ते २१ दिवसांनी रोपे काढून लागवड केली जाते. त्यासाठी लागवड केलेल्या क्षेत्राची नांगरणी करून चिखल केला जातो.खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर लागवड केली जात असल्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना रोपांची उगवण व योग्य पद्धतीने वाढ महत्त्वपूर्ण आहे. पेरणी पूर्ण झालेले शेतकरी लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहावे, तण उगवू नये, यासाठी नांगरणी करून ठेवत आहेत.तालुकानिहाय पेरणी क्षेत्रतालुका - पेरणी क्षेत्र

  • मंडणगड - १६५.२
  • दापोली - ४६२.२
  • खेड - २७३.२
  • चिपळूण - ४४४.७१
  • गुहागर - १११.२३
  • संगमेश्वर  -३५४.२
  • रत्नागिरी - २१०.६२
  • लांजा  -२४२.२
  • राजापूर  -२७८.२
  • एकूण  -२५४१.७६