शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पेरणीची लगबग, रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत किती हेक्टर क्षेत्रावर झाली पेरणी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:33 IST

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी ...

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी करणे अशक्य व धोकादायक होते. त्यामुळे पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामाला प्रारंभ केला. जिल्ह्याचे मुख्य पीक भात, तर दुय्यम पीक नागली असून, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रोपे काढून लागवड पद्धत अवलंबली जाते. जिल्ह्यात एकूण ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, आतापर्यंत एकूण २,५४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.मृग नक्षत्र सुरू झाले असून, सलग पाऊस नसला तरी बऱ्यापैकी उघडझाप सुरू आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा पाहून शेतकरी भात, नाचणीची पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, तर १० हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली जाते; मात्र तत्पूर्वी लागवडीसाठी रोपे काढण्यासाठी पेरणी केली जाते.सध्या जिल्ह्यात पेरणीची कामे सुरू आहेत. पारंपरिक नांगर; तसेच पाॅवर टिलरच्या साहाय्याने नांगरणी केली जात आहे; मात्र पाणथळ जमिनीत नांगरणी न करता कुदळीचा वापर करून खणून पेरणी करण्यात येत आहे. पेरणीनंतर २० ते २१ दिवसांनी रोपे काढून लागवड केली जाते. त्यासाठी लागवड केलेल्या क्षेत्राची नांगरणी करून चिखल केला जातो.खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर लागवड केली जात असल्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना रोपांची उगवण व योग्य पद्धतीने वाढ महत्त्वपूर्ण आहे. पेरणी पूर्ण झालेले शेतकरी लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहावे, तण उगवू नये, यासाठी नांगरणी करून ठेवत आहेत.तालुकानिहाय पेरणी क्षेत्रतालुका - पेरणी क्षेत्र

  • मंडणगड - १६५.२
  • दापोली - ४६२.२
  • खेड - २७३.२
  • चिपळूण - ४४४.७१
  • गुहागर - १११.२३
  • संगमेश्वर  -३५४.२
  • रत्नागिरी - २१०.६२
  • लांजा  -२४२.२
  • राजापूर  -२७८.२
  • एकूण  -२५४१.७६