शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीची लगबग, रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत किती हेक्टर क्षेत्रावर झाली पेरणी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:33 IST

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी ...

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी करणे अशक्य व धोकादायक होते. त्यामुळे पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामाला प्रारंभ केला. जिल्ह्याचे मुख्य पीक भात, तर दुय्यम पीक नागली असून, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रोपे काढून लागवड पद्धत अवलंबली जाते. जिल्ह्यात एकूण ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, आतापर्यंत एकूण २,५४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.मृग नक्षत्र सुरू झाले असून, सलग पाऊस नसला तरी बऱ्यापैकी उघडझाप सुरू आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा पाहून शेतकरी भात, नाचणीची पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, तर १० हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली जाते; मात्र तत्पूर्वी लागवडीसाठी रोपे काढण्यासाठी पेरणी केली जाते.सध्या जिल्ह्यात पेरणीची कामे सुरू आहेत. पारंपरिक नांगर; तसेच पाॅवर टिलरच्या साहाय्याने नांगरणी केली जात आहे; मात्र पाणथळ जमिनीत नांगरणी न करता कुदळीचा वापर करून खणून पेरणी करण्यात येत आहे. पेरणीनंतर २० ते २१ दिवसांनी रोपे काढून लागवड केली जाते. त्यासाठी लागवड केलेल्या क्षेत्राची नांगरणी करून चिखल केला जातो.खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर लागवड केली जात असल्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना रोपांची उगवण व योग्य पद्धतीने वाढ महत्त्वपूर्ण आहे. पेरणी पूर्ण झालेले शेतकरी लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहावे, तण उगवू नये, यासाठी नांगरणी करून ठेवत आहेत.तालुकानिहाय पेरणी क्षेत्रतालुका - पेरणी क्षेत्र

  • मंडणगड - १६५.२
  • दापोली - ४६२.२
  • खेड - २७३.२
  • चिपळूण - ४४४.७१
  • गुहागर - १११.२३
  • संगमेश्वर  -३५४.२
  • रत्नागिरी - २१०.६२
  • लांजा  -२४२.२
  • राजापूर  -२७८.२
  • एकूण  -२५४१.७६