शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

तवसाळ किनारी आढळली कासवांची ८७२ अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:25 IST

Wildlife Turtal Ratnagiri- गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असून, यामधील ८७२ अंड्यांचे जतन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकाच समुद्रकिनारी कासवांची एवढी घरटी व अंडी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कासवप्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

ठळक मुद्देतवसाळ किनारी आढळली कासवांची ८७२ अंडीजिल्ह्यात घरटी, अंडी मिळण्याची पहिलीच वेळ

असगोली : गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असून, यामधील ८७२ अंड्यांचे जतन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकाच समुद्रकिनारी कासवांची एवढी घरटी व अंडी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कासवप्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.तवसाळ समुद्रकिनारी पूर्वी मोठ्या प्रमाणात या जातीच्या कासवांची अंडी सापडतात. कालांतरानंतर जेएसडब्ल्यू बंदर व चौगुले उद्योग समुहाचे बंदर विकसित झाल्यानंतर या ठिकाणी समुद्रातील वाहतुकीची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे मध्यंतरीच्या कालखंडात या समुद्रकिनारी मादी कासवांचे अंडी घालण्याचे प्रमाण फारच कमी झाले होते. मात्र, यावर्षी कासवप्रेमींना ही आगळीवेगळी पर्वणी निर्माण झाली आहे.गावातील कासवप्रेमी युवक महेश सुर्वे हा गेली दोन वर्षे वनविभागाशी संबंधित आहे. या युवकाच्या लक्षात आल्यानंतर कासवांच्या अंड्यांबाबतची माहिती त्याने तातडीने गुहागर तालुक्याचे वनपाल यांना दिली. त्यानंतर वन विभागाने तातडीने सर्व अंड्यांचे जतन व संरक्षण केले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे यावर्षी कासवांच्या प्रजननावरही परिणाम झाला आहे. किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात कासव महोत्सवही होऊ शकलेला नाही. आता अंडी सापडू लागल्याने आनंद व्यक्त होत आहे.

वन विभागाच्या समन्वयातून व सहकार्यातून दापोली तालुक्यातील केळशीच्या धर्तीवर तवसाळमध्येसुद्धा कासव महोत्सव आयोजित करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कासव महोत्सवामुळे तवसाळमधील पर्यटनात वाढ होऊन ग्रामस्थांना चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महोत्सवानिमित्ताने पर्यटकही याठिकाणी दाखल होतील.- नीलेश सुर्वे,अध्यक्ष, कांदळवन समिती, तवसाळ 

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी