शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्योत्पादनामध्ये ५० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वेगवेगळ्या पद्धतीच्या मासेमारीचे वाढलेले प्रमाण, वादळी वातावरण आणि समुद्रातील प्रदूषण यामुळे जिल्ह्याच्या मासळी उत्पादनामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वेगवेगळ्या पद्धतीच्या मासेमारीचे वाढलेले प्रमाण, वादळी वातावरण आणि समुद्रातील प्रदूषण यामुळे जिल्ह्याच्या मासळी उत्पादनामध्ये गेल्या सात वर्षांत ५० टक्क्यांनी घट झाली आहे. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात मासळीचे उत्पादन ६५,३७४ मेट्रिक टन झाले आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात हेच उत्पादन १,१५,०४२ मेट्रिक टन इतके होते. दरवर्षी होत असलेली ही घट मच्छिमारांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला असून, मच्छिमार कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यासमोर भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. या क्षेत्रात १३ मासेमारी केंद्रे असून, किनाऱ्यावर असलेल्या १०४ गावांमध्ये बहुसंख्य मच्छिमार लोकच राहतात. जिल्ह्यात सन २००३ च्या गणनेनुसार मच्छिमारांची संख्या ६७,६१५ आहे. जिल्ह्यात ३,०७७ यांत्रिकी नौका, ४४२ बिगर यांत्रिकी नौका, ४६ मासळी उतरविण्याची केंद्रे, ८५ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, ३४ बर्फ कारखाने आहेत.

मत्स्योपादनात घट होण्यासह इतरही अनेक समस्या मच्छिमारांसमोर उभ्या आहेत. सततच्या वादळी वातावरणामुळे खोल समुद्रातील मासेमारी अनेकदा ठप्प असते. वेगवेगळ्या कंपन्यांमुळे समुद्रात झालेले प्रदूषण, त्याचबरोबर त्यांच्यासमोर खलाशांचा प्रश्न भेडसावत आहे. शिवाय डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने त्याचा खर्चही भागत नाही. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या डिझेलवरील सबसिडीच्या रकमेसाठी तीन-तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्यासमोर मासेमारी व्यवसाय कसा करायचा, अशी चिंता त्यांना सतावत आहे.

सन २०१४-१५ मध्ये मत्स्य उत्पादन १,१५,०४२ मेट्रिक टन होते. त्यामध्ये घट होऊन सन २०१५-१६ मध्ये तेच उत्पादन १८ हजार टनांनी घटल्याने ८७,०३० मेट्रिक टनावर आले. मात्र, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात त्यामध्ये ११ टनांनी वाढ होऊन ते ९८,४४३ मेट्रिक टन झाले. मात्र, त्यानंतरच्या पुढील चार वर्षांत मत्स्य उत्पादनात दरवर्षी घट झाल्याने मासेमारी व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत.

मागील सात वर्षांतील मत्स्योपादन

सन मेट्रिक टन

२०१४-१५ १,१५,०४२

२०१५-१६ ८७,०३०

२०१६-१७ ९८,४४३

२०१७-१८ ८०,३४०

२०१८-१९ ७३,७३८

२०१९-२० ६६,१७३

२०२०-२१ ६५,३७४

-------------------------------

मत्स्य उत्पादन कमी होण्याची कारणे अनेक आहेत. गेल्या वर्षात पर्ससीननेटने प्रमाणापेक्षा जास्त झालेली मासेमारी, मागील दोन वर्षांत लाईटच्या आधारे करण्यात येणारी मासेमारी, वादळी वातावरण, भूगर्भात होणारे बदल आणि किनारपट्टीवरील कारखान्यांकडून हाेणारे प्रदूषण यामुळे जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर परिणाम होऊन मत्स्य उत्पादन कमी झाले आहे. यावर शासनाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.

- शब्बीर भाटकर,

माजी चेअरमन,

रत्नागिरी मच्छिमार सोसायटी, राजिवडा, रत्नागिरी.