शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी आजपासून कोकणात येणार १५८५ जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात दीड लाख गणेशमूर्तींची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात दीड लाख गणेशमूर्तींची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात येते. नोकरी-व्यवसायासाठी परजिल्ह्यात स्थायिक असलेले मुंबईकर गावी येत असल्याने कोकणात १५८५ जादा गाड्या येणार आहेत. दि. ५ सप्टेंबरपासून कोकणात जादा गाड्यातून मुंबईकरांचे आगमन होणार आहे.

दरवर्षी कोकणात जादा गाड्या मुंबई व उपनगरातून सोडण्यात येतात. गतवर्षी कोरोनामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन झाले असताना अनेक मुंबईकर गावी आले होते. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातील अवघ्या २९५ जादा गाड्या आल्या होत्या. कोरोनामुळे आलेल्या गाड्या थेट कोरोना चाचणी केंद्रावर नेण्यात येत होत्या. चाचणी केल्यानंतर मुंबईकरांना विलगीकरण केंद्रावर ठेवण्यात आले होते. विलगीकरण सक्तीचे असल्याने गतवर्षी मुंबईकरांचा फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. मात्र, यावर्षी शासकीय निर्बंध शिथिल करण्यात आल्याने गाड्यांची संख्या वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात २५४, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५७, रत्नागिरी जिल्ह्यात ११७४ जादा गाड्या येणार आहेत. सर्वाधिक जादा गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात असून, चिपळूण व गुहागर तालुक्यात येणार आहेत. दि. ५ ते १० सप्टेंबरपर्यंत गाड्या कोकणात येणार आहेत. मंडणगड तालुक्यात ५४, दापोली ११७, खेड ११४, चिपळूण २६३, गुहागर २६८, देवरूख ८७, रत्नागिरी १४३, लांजा ७३, राजापूर तालुक्यात ५५ जादा गाड्या येणार आहेत. परतीसाठी गौरी गणपती विसर्जनापासून (दि. १४) जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १११० गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. ऑनलाइन आरक्षण उपलब्ध करण्यात आले.

--------------------

गणेशोत्सवासाठी जादा गाड्या येणार असल्याने रत्नागिरी विभागातर्फे दुरुस्तीपथके, गस्तीपथके, क्रेनची उपलब्धता केली जाणार आहे. कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा व हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्ती पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या चार ठिकाणी दुरुस्ती पथके उपलब्ध केली जाणार आहेत. शिवाय चिपळूण येथे क्रेन ठेवण्यात येणार आहे. अद्यावत ब्रेक व्हॅन विभागात तीन असून, महामार्गावर तैनात ठेवली जाणार आहेत. पैकी भरणानाका, चिपळूण, हातखंबा तिठा येथे ब्रेक डाऊन व्हॅन उपलब्ध असणार आहेत, तर संगमेश्वर आगारात दुरुस्तीपथक उपलब्ध केले जाणार आहे. जिल्ह्यात दि. ५ सप्टेंबरपासून दि. ९ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ————————-

गणेशभक्तांच्या स्वागतासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. रविवारी सात गाड्या येणार आहेत. दि. ८ रोजी ३०६, तर दि. ९ रोजी सर्वाधिक १०७३ गाड्या येणार आहेत. मंडणगड ते राजापूर आगारात जादा गाड्या दाखल होणार असून, प्रत्येक आगाराला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी