शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून १३० वनराई बंधारे

By admin | Updated: October 6, 2015 23:41 IST

पाणी टंचाईवर उपाय : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान

रहिम दलाल-- रत्नागिरी -‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या धर्तीवर महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गावोगावी लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची हजारो कामे सुरु असून, सुमारे २०० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये विद्यार्थी, स्थानिक रहिवासी श्रमदानासाठी पुढे सरसावल्याने जिल्हा परिषद कृषी विभाग अधिक जोमाने उतरला आहे. जिल्ह्यात चालू वर्षात उन्हाळ्यामध्ये जूनच्या पंधरवड्यामध्ये ९८ गावांतील २२७ वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यात येत होते. त्यामध्येही विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. त्याचे चांगले परिणाम उन्हाळ्यामध्ये दिसून येत होते. मात्र, मागील वर्षामध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम बंद करण्यात आले होते. यंदा पावसाचे प्रमाण आणि दरवर्षी जिल्ह्यात उद्भवणारी पाणीटंचाई याचा विचार करता येत्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान ५ ते ६ बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.पावसाळा संपल्याने आता ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. यासाठी प्लास्टिक पिशव्या, दगड, माती आदींचा वापर करण्यात येत आहे. हे अभियान राबवण्यासाठी तालुक्याचे सर्व प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी गावांमध्ये जाऊन पाणी अडवण्याबाबत जनजागृती करत आहेत. तसेच ते बंधाऱ्यांच्या बांधकामामध्ये सहभागी होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ठिकठिकाणच्या गावांमध्ये सुमारे १३० वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, जनता आणि खासगी कंपन्यांना सहकार्याचे आवाहनही केले होते. त्याला प्रतिसाद देत जयगड येथील जिंदल कंपनीने १ लाख प्लास्टिकच्या पिशव्या बंधाऱ्यांसाठी मोफत दिल्या आहेत. गावोगावी बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणी टंचाईवर मात करणे काही अंशी शक्य होणार आहे.त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. तालुका बांधलेले वनराई बंधारेमंडणगड०६दापोली५५खेड००चिपळूण१३गुहागर०६संगमेश्वर००रत्नागिरी०४लांजा१६राजापूर३०एकूण१३०