शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मुंबई-गोवा महामार्गाने घेतले १०३ बळी, २०१७ वर्ष : ‘हायवे’चा ‘डायवे’ कायम, मात्र अपघातांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:34 PM

सतत वर्दळ असलेला परंतु काही ठिकाणी राज्य मार्गाएवढाही रुंद नसलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र काही अद्यापही सुटलेले नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाच्या गप्पा रंगलेल्या असताना मावळलेल्या २०१७मध्येही महामार्गावरील खड्ड्यांनी आणि अरुंदपणाने १०३ प्रवाशांचे बळी घेतले. ​​​​​​​

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग बनला सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा पनवेल ते कसाल या ४५० किमीच्या महामार्गावर ८७८ अपघातांची नोंद अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले, तर १०३ प्रवाशांचा बळी गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ५०४ वाहनचालकांवर कारवाई २ कोटी ३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

विहार तेंडुलकर रत्नागिरी : सतत वर्दळ असलेला परंतु काही ठिकाणी राज्य मार्गाएवढाही रुंद नसलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र काही अद्यापही सुटलेले नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाच्या गप्पा रंगलेल्या असताना मावळलेल्या २०१७मध्येही महामार्गावरील खड्ड्यांनी आणि अरुंदपणाने १०३ प्रवाशांचे बळी घेतले.मुंबई-गोवा महामार्ग हा अरुंद, वाहनांची वाढती वर्दळ, खड्डे अशा अनेक कारणांनी चर्चेत आहे. या चर्चेत राहणाºया कारणांमुळेच महामार्गावर अपघात वाढत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग हा सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. २०१७या वर्षात पनवेल ते कसाल या ४५० किमीच्या महामार्गावर ८७८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले, तर १०३ प्रवाशांचा बळी गेला.

मागील काही वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असली तरी अपघातांचे प्रमाण अजूनही म्हणावे तेवढे कमी झालेले नाही, हेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी या महामार्गावर सरासरी एक हजार व्यक्तींचा अपघाती मृत्यू होतो, ते प्रमाण आता काहीसे कमी आले आहे.मात्र महामार्गावर मद्यपान करून गाडी चालवणे, कायद्याचे उल्लंघन होईल, अशा पध्दतीने वाहन हाकणे अशा विविध कारणांमुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा वाहनांची महामार्गावर कसून तपासणी करण्यात येते. मात्र तरीही हे प्रमाण कमी झालेले नाही. गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ५०४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यातून २ कोटी ३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.सध्या पर्यटन हंगाम असल्याने त्यातच गेल्या दहा दिवसात जोडून आलेल्या सुट्ट्या आणि नववर्ष स्वागत यामुळे महामार्गावर वाहनांची रेलचेल होती. मात्र तरीही वर्षभरात या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात संबंधित यंत्रणेला यश आले आहे. गेल्या वर्षभरात हे प्रमाण कमी आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.वर्ष          अपघातांची संख्या         मृत२०१३                 ११८६                २०१२०१४                 १०८४                २०५२०१५                 १०८८                १७४२०१६                १०५७                 १६३२०१७                  ८७८                १०३ 

सध्या या महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे तर दुसरीकडे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वळणदार रस्ते, वाढती अवजड वाहतूक, मद्यपान करून वाहन चालवणे, दुपदरी असलेल्या महामार्गावर रस्ता दुभाजकही नसणे अशा विविध कारणांमुळे हे अपघात होत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातhighwayमहामार्ग