VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:00 IST2025-06-01T16:59:17+5:302025-06-01T17:00:27+5:30
खरे तर, अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जयपूर येथे एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी हा प्रसंग घडला. आता या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्या शनिवारी पुन्हा एकदा अशाच अंदाजात दिसल्या. यावेळी त्यांनी एका एका मंत्र्याला व्यासपीठावरूनच टाळ्या न वाजवल्याबद्दल फटकारले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील तेथेच उपस्थित होते. खरे तर, अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जयपूर येथे एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी हा प्रसंग घडला. आता या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ३१ मे रोजी राजस्थानची राजधानी जयपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती कार्यक्रमालाही हजेरी लावली. यावेळी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी इतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना जेपी नड्डा यांचे स्वागत करण्यास सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या, "मी तुम्हा सर्वांच्या वतीने नड्डाजींचे स्वागत करू इच्छिते. यासाठी मोठ्याने टाळ्या वाजवा. यादरम्यान, वसुंधरा राजे तिथे बसलेल्या उपस्थितांना म्हणाल्या जोराने टाळ्या वाजवा, यावेळी एका मंत्र्याला उद्देशून वसुंधरा राजे म्हणाल्या, ओ मंत्रीजी जरा टाळ्या वाजवा नड्डाजींसाठी... मी म्हणतेय एकदा नड्डाजींसाठी जोराने टाळ्या वाजवा." हा 29 सेकेंदांचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर सोशल मीडिया युजर्सच्या विविध प्रकारच्या कमेंटदेखील येत आहेत.
ऐ मंत्री जी, ज़रा ज़ोर से तालियां बजा दो हमारे नड्डाजी के लिए!
— एक नजर (@1K_Nazar) May 31, 2025
- वसुंधरा राजे pic.twitter.com/ZeOAXJHLz7
यावेळी बोलताना वसुंधरा राजे यांनी नारी शक्तीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, महिला कुठलीही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकते, मग ती रेशनची असो अथवा प्रशासनाची. मोदी सरकारने नारी शक्ती वंदन कायदा मंजूर करून पूज्य अहिल्यादेवी होळकर यांच्या सारख्या वीर महिलांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अहिल्यादेवी या धर्माच्या रक्षक होत्या आणि एक अशा शासक होत्या, ज्यांनी बद्रीनाथपासून ते रामेश्वरमपर्यंत आणि द्वारकेपासून ते पुरीपर्यंत परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे पुनरुज्जीवन केले. यात काशीच्या विश्वनाथ मंदिराचाही समावेश आहे. त्यांचे योगदान, हे त्यांच्या धार्मिक आस्थेचे आणि सांस्कृतिक वारशाप्रती असलेल्या समर्पणाचे प्रमाण आहे.