शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

महिलांना एकाच छताखाली ‘भरोसा’, न्याय मिळण्यात मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 23:46 IST

रायगड पोलिसांचा उपक्रम : न्याय मिळण्यात मदतीचा हात

निखिल म्हात्रे

अलिबाग : हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणांत अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळण्यासाठी रायगड पोलिसांनी ‘भरोसा’ सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जाणार आहे. मात्र, भरोसा सेलला आणखी सकारात्मकपणे काम करण्याची गरज आहे. कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू केले.

भरोसा सेल हे पीडित महिला व मुले यांच्या तक्र ारी स्वीकारण्यासाठी २४ तास सुरू असणार आहे. रात्री-बेरात्री कुणी महिला आल्यास तिच्या राहण्याची व्यवस्थादेखील करण्यात येते. तसेच १०० या महिला हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारदारांच्या तक्रारी स्वीकारून त्या संबंधित तज्ज्ञांकडे तत्काळ पाठविण्यात येतात. महत्त्वाचे म्हणजे पीडित महिलांकडून प्राप्त झालेल्या तक्र ारींचे वर्गीकरण करून त्यांना त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करण्यात येते. संबंधित तक्रारकर्त्यांचे समुपदेशन करून आवश्यकता असल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्थादेखील करण्यात येते. भरोसा सेलमध्ये प्राप्त झालेल्या तक्र ारींमधील पीडित व्यक्तीस न्याय मिळत नाही तोपर्यंत तक्र ार बंद करून कुठलाही एकतर्फी निर्णय घेतला जात नाही. भरोसा सेल अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण तसेच विधिविषयक सेवा, वैद्यकीय सेवा, चाईल्ड हेल्पलाइन, महिला हेल्पलाइन, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, पीडित महिलांचे पुनर्वसन या सेवांचा समावेश आहे.हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणांत अनेक महिलांना कुठे व कसा न्याय मागावा हेच अनेकदा समजत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन होणे गरजेचे असते. कुणाच्या सुखी संसाराला तडा जाऊ नये, यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे ‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशन करण्यात येते. समुपदेशन करूनही त्यांचे समाधान न झाल्यास शेवटी गुन्हा दाखल करण्यात येतो. यातून त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास निश्चित मदत होत आहे. तसेच महिलांनी आत्मनिर्भर राहावे. कारण कुठलाही प्रसंग सांगून येत नाही. विवाह करताना वर-वधू पक्षांकडील योग्य ती माहिती घेऊन निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे जन्मपत्रिका पाहण्याऐवजी वैद्यकीय तपासणी करणे काळाची गरज आहे.- अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक, रायगडसमुपदेशनाद्वारे तक्र ारींचे निवारणच्लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी काही वेळा दारोदार फिरावे लागते. बलात्कार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा कुटुंबीयांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे ती शारीरिक व मानिसकरीत्या खचते. हक्क मागणाऱ्या विधवा आणि घटस्फोटाच्या घटनांमधील महिलांचेही असेच होते. तिच्या अगतिकतेचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार घडतात.च्पोलीस स्टेशनला तक्र ार न देताही भरोसा सेलमध्ये तक्र ार नोंदविता येणार आहे. पीडित महिलेला समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधिविषयक सेवा, मानसोपचारतज्ज्ञ, पीडित महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक कायद्यांतर्गत संरक्षण दिले जाते. यातून त्यांचा वेळ, पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास मदत होईल.च्भरोसा केंद्रात तक्र ारीविकल, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांसोबतच स्थानिक भरोसा सेलमध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक साहाय्यक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकासह कर्मचारीसुद्धा नियुक्त आहेत. महिलांप्रमाणेच ‘भरोसा सेल’ पुरुषांनादेखील मदतनीस ठरत आहे. _हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात भरोसा सेलचा प्रयोग प्रथमच नागपुरात राबविण्यात आला होता. याला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यात भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे. 

टॅग्स :RaigadरायगडWomenमहिला