शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच आगामी निवडणुका लढविणार - तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:41 PM

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत

रेवदंडा : धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी चौल येथे काढले.चौल नाका येथे अलिबाग तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी तटकरे बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भडकल्या असून रोजगार निर्मितीचे भारतीय जनता पक्षाने दिलेले आश्वासन फसवे ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.रायगडचे खासदार केंद्रीय मंत्री असून एकही उद्योग या जिल्ह्यात आणला नाही, ही मंत्रिपदाची शोकांतिका आहे. मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली असताना सरकार गांभीर्याने दखल घेत नाही असे सांगून गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने शेतीचे, मच्छीमारांचे केलेले नुकसानाबाबत राज्य सरकार काही बोलत नाही. नजीकच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका आहेत. त्यामुळे मित्रपक्षांना सोबत घेऊन विजय संपादन करण्याचा सल्ला तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.मेळाव्यात तालुक्यातील काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर काही कार्यकर्त्यांना पदावर नियुक्ती करण्याची पत्र वाटप करण्यात आले. कार्यक्र माला पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष निगडे, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, मांडवा ते रेवदंडा परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज धुमाळ यांनी केले तर सूत्रसंचालन हेमंत खरसंबले व आसिफ किरकिरे यांनी केले.