शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

कोणता झेंडा घेऊ हाती म्हणण्याची वेळ; राजकारणात कार्यकर्त्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:02 IST

आपल्या उमेदवारास विजयी करण्यासाठी स्पर्धा

माथेरान : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यासह देशात सर्वत्रच प्रचाराला उधाण आलेले असून, जो तो आपापल्या परीने आपल्या युती अथवा आघाडीची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. पाच वर्षांपूर्वी राजकीय मतभेद असणारे, एकमेकांना पाण्यात पाहणारे आणि इभ्रतीसकट लाखोली वाहणारी राजकीय मंडळी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनासुद्धा आमिषे दाखवून गल्लीबोळात गळ्यात गळा घालून मिरवताना दिसत आहेत. यापूर्वी कधीही एवढ्या खालच्या थराला राजकारण गेले नव्हते, ते सध्या मतदारवर्ग उघड्या डोळ्यांनी अनुभवत आहेत. प्रत्येक सभेला एक करमणूक म्हणूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहावयास मिळत आहे. एकमेकांविरोधात रणशिंग फुंकून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये अल्पावधीतच राजकीय संन्यास घेणारी मंडळीही त्याच दिमाखात आजही आपल्या भूमिका मांडत आहेत. ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही त्यांनी पक्ष बदल करून दुसऱ्या पक्षाच्या झेंड्याखाली गुमान काम करीत आहेत. एकंदरच परिस्थितीचे अवलोकन करता या राजकारण्यांना स्वाभिमान राहिलेला नाही. सर्व नैतिक मूल्ये आणि जबाबदारी विसरून केवळ उमेदवारी मिळावी म्हणून आपला हक्क, स्वाभिमान गहाण ठेवलेला आहे. त्यातच धर्मरक्षण करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसून केवळ संसदेत खुर्ची मिळावी, यासाठी खटाटोप सुरू आहे.एक दिवसाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कुठल्याही एका पक्षाची सत्ता स्थापन होणार आहे. तद्नंतर पुन्हा ही राजकीय मंडळी एकोप्याने, गुण्यागोविंदाने एकत्र नांदणार आहेत. पुन्हा पाच वर्षे एकमेकांची उणीधुनी आणि विरोध करणे हे कायमस्वरूपी राहणार आहेच. या राजकारण्याच्या निवडून येण्यासाठी सुरू असलेल्या भांडणात बिचाºया कार्यकर्त्यांचे हाल होताना दिसत आहेत. पक्षश्रेष्ठींनी हुकूम सोडल्यावर ज्या पक्षाशी काडीचेही घेणे-देणे नाही. अन्य पक्षावर अथवा त्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अगोदर असणाºया रागावरही विरजन टाकून नाईलाजाने कामे करावी लागत आहेत.युतीमध्ये अथवा आघाडीमध्ये त्या त्या पद्धतीने झेंडे गळ्यात घालून मिरवावे लागत आहे. निवडणुका पूर्ण झाल्यावर केवळ कार्यकर्ते एकमेकांविरोधात दंड थोपटत असतात. मात्र, याबाबत नेतेमंडळी अथवा पक्षश्रेष्ठी ‘ब्र’ शब्द काढीत नाहीत. सध्या तर सोशल मीडियावर विविध व्यंगचित्र आणि बॅनर बनवून, व्हिडीओ क्लिप बनवून एकमेकांच्या विरोधात पक्षाचे कार्यकर्ते आगपाखड करत आहेत. त्यामुळे खूपच खालच्या पातळीवरचे राजकारण नेतेमंडळी कार्यकर्त्यांमार्फत करवून घेत आहेत. या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने मुख्य कार्यकर्त्यांची झोळी भरली जाते तर अनेकांना फक्त दोन वेळचे जेवण अथवा ओल्या-सुक्या पार्ट्या देऊन एकप्रकारे मनोरंजन केले जाते.राजकीय नेत्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पैशाने पैसा खेचायचा ही वृत्ती अंगीकारली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019