शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जिल्ह्यात गणेशोत्सव खरेदीचा संडे मूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 02:52 IST

गणरायाच्या आगमनाला अवघे तीनच दिवस शिल्लक असताना वाढत्या महागाईमुळे बाजारामध्ये म्हणावी तशी खरेदीची धूम दिसून येत नव्हती.

- आविष्कार देसाई अलिबाग : गणरायाच्या आगमनाला अवघे तीनच दिवस शिल्लक असताना वाढत्या महागाईमुळे बाजारामध्ये म्हणावी तशी खरेदीची धूम दिसून येत नव्हती. पण गणपती आगमनापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने बाजारात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी रहिवाशांनी एकच गर्दी केली होती. यंदा बाप्पासाठी लागणाऱ्या पूजेच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, फुले-हार, फळे यांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.गणेशोत्सवाला १३ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. कोकणासह सर्वत्र बाप्पाचा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. कोकणामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सवांची संख्या अधिक असते. दीड दिवसापासून ते २१ दिवसांपर्यंत मुक्कामाला येणाºया बाप्पासाठी मनोभावे जय्यत तयारी करण्यात गणेशभक्त कोणतीच कसूर करत नाहीत. मात्र यंदाच्या वर्षी बाप्पाचे लाड पुरवताना भक्तांच्या खिशाला चांगलीच चाट लागणार आहे. वाढत्या महागाईचा परिणाम हा त्यांच्या बजेटवर होणार आहे. मराठी माणूस हा मुळातच उत्सवप्रेमी असल्यामुळे जीवाचे रान करून तो बाप्पाच्या आगमनाची व त्यांच्या मुक्कामाच्या वेळी कोणतीच कमतरता राहणार नाही याची काळजी घेईल, असे काही गणेश भक्तांनी सांगितले.बाप्पाचे आगमन तीनच दिवसांवर येऊन ठेपले आहे, त्यामुळे रविवारी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले. थर्माकोलवर बंदी आल्याने सजावटीसाठी बाजारामध्ये जिवंत झाडे विकण्यासाठी उपलब्ध झाली आहेत, तसेच कागदी फुलेही आहेत. परंतु, त्यांच्या किमती सुमारे १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. थर्माकोलच्या मखराला पर्याय म्हणून कागद आणि कापडापासून तयार केलेली मखरे बाजारात विक्रीसाठी आहेत.गणरायाच्या नियमित पूजेसाठी लागणारा कापूरही प्रचंड महागला आहे. ४०० रुपये किलोने मिळणारा कापूर आता तब्बल एक हजार २०० रुपयांवर गेला आहे. १५ रुपयांचा नारळ ३० रुपयांना मिळत आहे. अगरबत्तींच्या किमतीही सुमारे १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. धूपच्या किमतींनीही किलोमागे तीनशे रुपयांनी उभारी घेतली असल्याचे विक्रेते राहुल साष्टे यांनी सांगितले.बाप्पासाठी विविध फळांचा वापर केला जातो. त्यातील सफरचंद, केळी, पपई, चिकू, अननस, काकडी, डाळींब, द्राक्ष, संत्री आणि मोसंबी यांच्या किमतीही सुमारे २० टक्क्यांनी वाढल्या असल्याचे दिसून येते.महाडमध्ये बाजारपेठ फुललीमहाड : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी महाड बाजारपेठ फुलून गेल्याचे दिसून आले. गणेश आरास सजावटीच्या साहित्यांसह रेडिमेड मखर, पूजेचे साहित्य, गणरायासाठी आकर्षक कंठ्या, कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली. महाड बाजारपेठेतील सर्व दुकाने सजावटीच्या साहित्यासह अन्य सामानांनी सजली आहेत. यंदा महागाई गगनाला भिडली असली तरी गणेशोत्सव खरेदीवर त्याचा कसलाही परिणाम जाणवत नसल्याचे महाड बाजारपेठेतील गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या गर्दीवरून दिसून येत आहे. प्लॅस्टिक व थर्माकोल वापरावर यंदापासून बंदी असल्याने पुठ्ठा व कागदी मखरांना महाडमध्ये चांगली मागणी आहे.पोलिसांचा कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देणारमोहोपाडा : गणेशोत्सव सण हा धार्मिक भावनेने साजरा केला जातो. सणाला कोणतेही गालबोट लागू नये याकरिता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमिटी सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, डीजे चालक-मालक आदींच्या उपस्थितीत सणाच्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले होते. त्यात पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देण्याची भूमिका मांडली.पेणमध्ये गौराईच्या २००० मूर्ती तयारपेण : बाप्पाच्या सुखद आगमनानंतर मांगल्यकारी कुटुंबवत्सलतेचा नजारा साजरा करण्याचा धम्माल सण म्हणजे गौरीचा. माहेरवाशीण गौराई धनधान्य समृद्धीचा वरदहस्त असल्याने कोकणात गौरीच्या आगमनाची तयारीही जोरदार सुरू आहे. पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये गौरीचे मुखवटे, पूर्ण मातीच्या गौरीच्या मूर्ती नखशिखांत सजल्या आहेत. गौरार्इंचे हे मनमोहक रुपडे येणाºया गणेशभक्तांना कार्यशाळांमध्ये आकर्षित करीत आहे. तब्बल २००० ते २५०० गौरी नखशिखांत रंगरंगोटी करून आपल्या भक्तगणांच्या इच्छित स्थळी जाण्यास सज्ज झाल्या आहेत.महामार्ग बहुतांशी खड्डेमुक्तनागोठणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा महामार्ग खड्डेमुक्त न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा उचलला जाईल असा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित रस्ता ९० टक्के खड्डेमुक्त केला आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटरचा बहुतांशी रस्ता खड्डेमय झाला होता. गणेशोत्सव जवळ येत असल्याने रस्ता सुधारला नाही, तर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यानुसार प्राधिकरणाने पनवेल - पेण - वडखळ - नागोठणे - वाकण - सुकेळी - कोलाड - इंदापूर या मार्गावरील जवळपास ९० टक्के खड्डे बुजवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सव