शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीमध्ये २ लाख ८५ हजार वाहनांचे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:38 IST

संडे अँकर । कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना : औषध फवारणी केल्यानंतरच मार्केटमध्ये प्रवेश; प्रतिदिन साडेनऊशे वाहनांनाच परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तब्बल २ लाख ८५ हजार वाहनांचे निर्जंतुकीकरण केले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक उपाययोजना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राबविण्यात येत आहेत. मार्केट आवारातील प्रादुर्भाव कमी करणे व मुंबईकरांना अखंडपणे जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
याचाच भाग म्हणून मार्केटमध्ये येणाºया प्रत्येक वाहनावर औषध फवारणी केली जात आहे. शेतमाल घेऊन येणारी वाहने, खरेदीदार व व्यापाऱ्यांच्या वाहनांवरही औषधांची फवारणी केली जात आहे. वाहनांमुळे विषाणूंचा प्रचार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. गाडी चालविणाºयांनाही मास्क घालण्याच्या व सॅनेटायझर वापरण्याच्या सूचना केल्या जात आहेत. २० मार्चपासून आतापर्यंत तब्बल २ लाख ८५ हजार वाहनांवर औषध फवारणी केली आहे. पाचही मार्केटमध्ये आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती सचिव अनिल चव्हाण यांनी दिली आहे.
बाजार समिती प्रशासनाने मार्केटमध्ये येणाºया वाहनांच्या संख्येवरही निर्बंध घातले आहेत. पाचही मार्केटमध्ये शेतमाल घेऊन येणाºया साडेनऊशे वाहनांनाच प्रतिदिन प्रवेश दिला जात आहे. खरेदीदारांच्या वाहनांसाठीही परवाना घेणे बंधनकारक आहे. मार्केटमधील व्यापारी व इतर काम करणाºया व्यक्तींनाच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. विनाकारण कोणालाही मार्केटमध्ये फिरू दिले जात नाही.