शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

श्रीवर्धनमध्ये मच्छीमारांचा आक्रोश, नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 2:40 AM

या वर्षी पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे समुद्रात वादळी वारे निर्माण झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला.

श्रीवर्धन : या वर्षी पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे समुद्रात वादळी वारे निर्माण झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला. त्याचे दूरगामी परिणाम रायगड जिल्ह्यातील मासेमारी करणाºया लोकांच्या जीवनावर झाले आहेत.यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतक-याला एकरी मदत देण्यात आली आहे; त्याच धर्तीवर मासेमारी करणाऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी श्रीवर्धनमधील मासेमारी करणाºयांनी केली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता श्रीवर्धन तालुक्यातील कोळी समाजाने नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढत श्रीवर्धन तालुक्यात मत्स्य दुष्काळ जाहीर करावा असे फलक घेऊन शासन दरबारी आपला आक्रोश व्यक्त केला. या पदयात्रेत तालुक्यातील कोळी समाजातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.डिझेल सबसिडी मिळावी, शेतक-यांप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, उपजीविकेचे दुसरे साधन उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी कोळी समाजाच्या विविध नेत्यांनी समाजाला संबोधित करताना व्यक्त केली. श्रीवर्धन कुणबी समाज सभागृहात तालुक्यातील सर्व मच्छीमार संघटनानी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या व्यथा व्यक्त मांडल्या. तहसीलदार सचिन गोसावी यांना सर्व मासेमारी करणाºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दुपारी १ च्या सुमारास दिले. त्यापूर्वी श्रीवर्धन शिवसेना कार्यकारिणीने ११ वाजता मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन सादर केले. शिवसेनेकडून तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर, सुयोग लांगी, जुनेद दुस्ते, नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर व कोळी समाज आणि मासळी व्यावसायिकांच्या वतीने रामचंद्र वाघे, दिनेश चोगले, यशवंत चौलकर, इम्तियाज कोळपे, हरिदास वाघे, नंदू रघुवीर, भास्कर चौलकर, सायब हंमदुल्ले यांनी निवेदन दिले.वादळाने मच्छीमारांचे नुकसानगेल्या दोन वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. पावसाळ्यात बोटीची डागडुजी व नवनिर्मिती केली जाते. साधारणत: बोटीच्या आकारानुसार ५० हजारांपासून ते २ लाखांपर्यंतचा खर्च बोट निर्मितीसाठी येतो. मासेमारी करण्यासाठी जाळे प्रत्येक वर्षी नवीन बनवले जाते किंवा जुन्या जाळ्याची खर्च करून दुरुस्ती केली जाते. बोटींवर काम करणाºया खलाशांना आगाऊ रक्कम दिली जाते. या वर्षी आलेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळांनी मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या जनसामान्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतले आहे. खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासे मिळत नाहीत; पूर्वी ५ वावापर्यंत जाऊन मासे मिळत होते, आता १२ वावाच्या पुढे जाऊनसुद्धा मासे मिळत नाहीत, असे चंद्रकांत वाघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या वर्षी मासळी मिळत नसल्याने कोळी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मासेमारी हा कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. सरकारने मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे .- भारत चोगले,व्यावसायिक, श्रीवर्धनक्यार, महा वादळामुळे तसेच सतत बदलणाºया हवामानामुळे मच्छीमारांचे नुकसान होत आहेत. कोळी समाजाने त्यांची ही व्यथा, अडचण निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. हे निवेदन तत्काळ वरिष्ठ पातळीवर पाठवले जाईल.- सचिन गोसावी,तहसीलदार, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार