शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कांदळवनांच्या क्षेत्राचे वास्तव : १५ गावांतील शेतकरी, मच्छीमारांची होणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:04 IST

रायगड जिल्ह्यातील कांदळवनांच्या क्षेत्राचे वास्तव ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर गावागावातील शेतकरी, मच्छीमार विशेष करून नारी शक्ती जागी झाली आहे.

- आविष्कार देसाई ।अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कांदळवनांच्या क्षेत्राचे वास्तव ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर गावागावातील शेतकरी, मच्छीमार विशेष करून नारी शक्ती जागी झाली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सरकारने आणलेल्या ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ यशस्वीपणे राबविण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. जिल्हाधिकाºयांनी या योजनेचे प्रेझेंटशन द्यावे, अशी मागणी करण्यासाठी जिल्हाधिकाºयांची मंगळवारी भेट घेण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच परिसरातील १५ गावातील शेतकरी, मच्छीमार, कष्टकरी यांची रविवारी बैठक बोलावण्यात आल्याचीमाहिती श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी दिली.सरकारची योजना पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच शेतकरी, मच्छीमार, कष्टकरी यांचा आर्थिक स्तर उंचावणारी आहे. योजनेचा लाभ खºया लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी मुळात त्यांना योजनेची माहिती असणे गरजेचे असते. तेव्हाच ती यशस्वीपणे राबवता येते. ‘लोकमत’ने या योजनेची माहिती २७ सप्टेंबरच्या अंकात प्रसिध्द केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. नंदन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, किती सरकारी जमिनीवर कांदळवने आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे, मात्र खासगी जमिनींचे सर्व्हेक्षणच झालेले नसल्याने त्याचा आकडा प्रशासनाकडे नाही हे देखील उघड झाले आहे असेही, त्यांनी स्पष्ट केले.सरकारी योजनेचा गावागावांमध्ये फायदा झाला पाहिजे यासाठी २८ सप्टेंबर रोजी श्रमिक मुक्ती दलाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. जिल्हाधिकाºयांनी या योजनेचे प्रेझेंटेशन दिल्यास योजना नेमकी काय आहे, सरकारचे धोरण आणि प्रशासन ते कसे राबवणार याची किमान माहिती शेतकºयांसह मच्छीमारांना होईल, या निर्णयावर बैठकीत एकमत झाल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ गावातील प्रत्येक ग्रामस्थांना कळावी यासाठी १ आॅगस्ट रोजी शहापूर येथे १५ गावातील ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.खारबंदिस्तीकडे दुर्लक्ष केल्याने हजारो हेक्टर जमीन नापीकखारभूमी विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनाने खारबंदिस्तीकडे दुर्लक्ष केल्याने हजारो हेक्टर नापीक झाल्याचे जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे खासगी जमिनींचे सर्व्हेक्षण झाले नसल्याने कोणाची कोणती जागा आहे, कोणत्या जागेत किती कांदळवन आहे हे सांगण्यासाठी खासगी मालकांच्या जागेमध्ये सीमांकन झालेले नाही. त्यामुळे अनिश्चितता आहे. खासगी जमिनींचे तातडीने सर्व्हेक्षण केल्यास योजनेतील अडसर दूर करता येईल, असेही राजन भगत यांनी सांगितले.